शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
3
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
4
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
5
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
6
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
7
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
8
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
9
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
10
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
11
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
12
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
13
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
14
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
15
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
16
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
17
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
18
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
19
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
20
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."

गर्दीच्या हंगामात रत्नागिरीतील पर्यटनस्थळे बंद, पर्यटकांचा हिरमोड 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 12:45 PM

पर्यटनस्थळे सर्व वारी सुरू ठेवावीत, असे आदेश. परंतु, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही

रत्नागिरी : सध्या ख्रिसमसची सुट्टी पडल्याने पर्यटकांची पावले कोकणाकडे वळली आहेत. विशेषत: समुद्रकिनाऱ्याचे पर्यटकांना आकर्षण असल्याने रत्नागिरी तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. एकीकडे पर्यटकांची संख्या वाढत असतानाच रत्नागिरीतील पर्यटनस्थळे मात्र बंद ठेवण्यात आल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.नाताळची सुट्टी आणि शनिवार, रविवार जोडून आलेली सुट्टी यामुळे पर्यटकांची पावले रत्नागिरीकडे वळली आहेत. कोकणातील समुद्रकिनाऱ्याला पर्यटक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे श्रीक्षेत्र गणपतीपुळेतील गणेश मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागत आहे. पर्यटकांनी गर्दी केल्याने स्थानिक दुकानदारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या सरस बचत गटांच्या प्रदर्शनालाही पर्यटक हजेरी लावत आहेत.गणपतीपुळे येथील पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर पर्यटक रत्नागिरीतील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी येत आहेत. मात्र, ही पर्यटनस्थळे सोमवारी बंद ठेवण्यात आल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. रत्नागिरीतील टिळक जन्मभूमी व थिबा पॅलेस ही पर्यटनस्थळे सोमवारी म्हणून बंद ठेवण्यात आली होती. थिबा पॅलेसच्या आवाराबाहेर तसा फलकही लावण्यात आला आहे.त्यामुळे बाहेर जाऊन आलेल्या पर्यटकांची व सहलीतील मुलांची मोठी निराशा झाली. ही स्थळे सर्व वारी सुरू ठेवावीत, असे आदेश देण्यात आले होते. परंतु, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने पर्यटनाला त्याचा फटका बसत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन