शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

शेतकऱ्यांवर विश्वास टाका, भारत महासत्ता बनेल; राजू शेट्टी यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 8:38 AM

सत्ताधारी आणि विरोधकांना शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिलेले नाही.

महाड : सत्ताधारी आणि विरोधकांना शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिलेले नाही. जनतेच्या पैशांची लूट आणि विकासकामांची टक्केवारी घेणाऱ्यांना शिवरायांच्या विचारांचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांना किल्ले रायगडावर येऊन महाराजांचे आशीर्वाद घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असे परखड मत व्यक्त करताना शेतकऱ्यांवर विश्वास टाकला तर भारत महासत्ता बनेल, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाचाड येथील मेळाव्यात व्यक्त केला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती हे ९० दिवसांचे राज्यव्यापी अभियान सुरू होत असून त्याचा प्रारंभ किल्ले रायगड येथून शनिवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, संदीप जगताप, युवा जिल्हाध्यक्ष सागर शंभू शेट्टे, प्रदेश युवती अध्यक्ष पूजा मोरे, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, जि. प. सदस्य रामचंद्र शिंदे, राजेश पाटील आदी उपस्थित होते. 

देशाची अर्थव्यवस्था उद्योगधंद्यांमुळे नव्हे तर शेतकऱ्यांमुळे वृद्धिंगत झालेली आहे. त्यांच्यावर विश्वास टाकला तर भारत हा जगाचा अन्नदाता बनू शकतो. मात्र, त्यांचा विचार करण्याची मानसिकता केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नाही. - राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

शनिवारी सकाळी शेट्टी यांनी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत या अभियानाचा प्रारंभ केला.  या  मेळाव्यात शेट्टी यांनी सत्ताधारी व विरोधक या दोघांवरही टीका केली. राज्यकर्ते शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनेतून भ्रष्टाचार करत आहेत. एखादा अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी लाखो रुपये घेत आहेत. या लाचखोरीचा परिणाम सर्व सामान्य जनतेच्या जीवनावर होत आहे. आपल्या या अभियानातून शेतकऱ्यांच्या खऱ्या परिस्थितीचा लेखाजोखा मांडू, असे ते म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी