शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
2
प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा
3
भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा
4
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
5
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
6
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
7
अंबानी कुटुंबाकडून रतन टाटांचे स्मरण; रिलायन्सच्या वार्षिक कार्यक्रमात टाटांना वाहिली श्रद्धांजली
8
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
9
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
10
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
11
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
12
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
13
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
14
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
15
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
16
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
17
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
18
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
19
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
20
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया

Shiv Sena: कोणता हा झेंडा घेऊ हाती? सामान्य शिवसैनिकांचा संभ्रम कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 7:24 PM

शिंदे यांच्या बंडाबाबत नेमकी कारवाई पक्षाकडून केली जात नसल्याने त्या गटातील संख्या रोज वाढतच आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा संभ्रम वाढतच चालला आहे.

मनोज मुळ्येरत्नागिरी : शिवसेनेच्या जिल्ह्यातील चार आमदारांपैकी दोघांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिल्याने आपण काय करायचे, कोणासोबत जायचे असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांसमोर आहे. शिंदे यांच्या बंडाबाबत नेमकी कारवाई पक्षाकडून केली जात नसल्याने त्या गटातील संख्या रोज वाढतच आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा संभ्रम वाढतच चालला आहे. हातातला भगवा कायम ठेवावा की, बंडाचा झेंडा घ्यावा, यात असंख्य शिवसैनिक अडकले आहेत.मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारले आणि शिवसेनेत मोठा भूकंप झाला. दहा-बारा गेले, अजून जाणार अशा चर्चा पहिल्या दिवशी होत्या. दुसऱ्या दिवशीपासून जाणाऱ्यांची संख्या वाढली आणि शिवसैनिक गोंधळले. बंड यशस्वी होणार की पक्ष त्यांना परत आणणार, एवढेच प्रश्न शिवसैनिकांच्या मनात होते.

जिल्ह्यात उदय सामंत (रत्नागिरी), भास्कर जाधव (चिपळूण), राजन साळवी (राजापूर) आणि योगेश कदम (दापोली) हे शिवसेनेचे चार आमदार आहेत. यातील योगेश कदम यांनी सर्वांत आधी शिंदे गट गाठला आणि रविवारी मंत्री उदय सामंत गुवाहाटीला बंडखोर गटात सहभागी झाले.या दोन्ही आमदारांची पक्षातील कार्यकर्त्यांशी उत्तम संबंध आहेत. हे दोघेही शिवसेनेत सक्रिय होण्याच्या आधीपासूनच शिवसेना मजबूत होती. मात्र, या दोघांनी आपापल्या मतदारसंघात ही मजबुती वाढवली आहे. पक्षाइतकेच त्यांच्याशी प्रामाणिक आसलेल्या कार्यकर्त्यांची संख्याही खूप मोठी आहे. त्यामुळेच आता काय करायचे, असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांच्या मनात आहे.‘इधर चला मै, उधर चला...’

ज्यांनी बंडात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच दापोली, खेड, मंडणगड आणि रत्नागिरी तालुक्यात कार्यकर्ते संभ्रमित अवस्थेत आहेत. इकडे जायचे की तिकडे हा निर्णय घेताना त्यांना अडचण येत आहे. सध्या कोणी अधिकृतपणे बोलत नसले तरी आपापसात याच विषयाची चर्चा केली जात आहे.

दापोलीत आधीच फेरबदलशिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांपैकी योगेश कदम यांच्या मतदारसंघात शिवसेनेत आधीपासूनच दोन गट झाले आहेत. दापोली-मंडणगडच्या नगरपंचायत निवडणुकीत योगेश कदम यांना बाजूला केल्यानंतर पालकमंत्री अनिल परब यांनी तत्काळ संघटनेत फेरबदल केले. योगेश कदम यांच्याशी जवळीक असलेले पदाधिकारी बाजूला करण्यात आले. त्यामुळे तेथे पदाधिकारी बाजूला जाण्याची शक्यता कमी आहे.

सामंत यांची पकड२०१४ मध्ये उदय सामंत शिवसेनेत दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी, कार्यकर्तेही शिवसेनेत गेले. यथावकाश त्यांना पदेही दिली गेली. त्यामुळे सद्यस्थितीत अनेक महत्त्वाच्या पदांवर सामंत यांच्याशी जवळीक असलेले पदाधिकारी आहेत. त्यावर सामंत यांची चांगली पकड आहे. सामंत यांनी कामे देऊन अनेकांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेला मोठा फटका बसू शकेल.

राष्ट्रवादीशी आघाडी नकोराष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याला शिवसैनिकांचा मुळातच ठाम विरोध होता. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत शिवसेनेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचेच आव्हान आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणूक शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी झाली आहे. ज्यांच्याशी सातत्याने विरोधात लढलो आहोत, वाद घातले आहेत, आरोप केले आहेत, त्यांच्यासोबतच एकत्र राहण्याला शिवसैनिकांचा विरोध आहे. त्यामुळे पक्षासाेबत आहोत, असे सांगणाऱ्या अनेक सामान्य शिवसैनिकांनाही एकनाथ शिंदे यांचा मुद्दा पटलेला आहे.आम्ही सामंतांसोबतरत्नागिरी शिवसेनेतील जे पदाधिकारी उदय सामंत यांच्यासोबत शिवसेनेत आले, त्या सर्वांमध्ये यापुढेही सामंत यांच्यासोबतच राहण्याची भूमिका ठाम आहे. अर्थात लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे काही पदाधिकारी मात्र द्विधा मनस्थितीत आहेत. एकीकडे सामंत यांची साथ, त्यांचा वरदहस्त हवा असतानाच दुसरीकडे पद सोडावे लागेल, हे दु:खही आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना