शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबईत महिलेचा खून करून दोघे रत्नागिरीत; पोलिसांनी लावला छडा

By अरुण आडिवरेकर | Published: May 01, 2023 12:15 PM

मुंबईत खून करुन दोन आरोपी रत्नागिरीत आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या टीमने रत्नागिरी शहर पोलिसांना दिली होती

रत्नागिरी : मुंबईत एका महिलेचा खून करुन रत्नागिरीत आश्रयाला आलेल्या दोन संशयितांना रत्नागिरी शहर पोलिसांनी रविवारी (३० एप्रिल) ताब्यात घेतले आहे. हे दोघेही संशयित रत्नागिरीतील आंबेशेत परिसरात एका घरात राहत होते. त्यांना आश्रय दिलेल्या घरमालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबईत खून करुन दोन आरोपी रत्नागिरीत आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या टीमने रत्नागिरी शहर पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर रत्नागिरी पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती. रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी तत्काळ यंत्रणा कामाला लावली. संशयित आरोपींच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली. चौकशीदरम्यान दोन संशयित आंबेशेत येथील एका घरात आश्रयाला आले आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली. हे दोन्ही संशयित परिसरात बिनधास्त वावरत होते. नवीन चेहरे दिसत असल्यामुळे परिसरात चर्चाही सुरू होती. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी करून दोघांनाही ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणी घर मालकालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. या घरमालकाने दोघांना भाड्याने खोली दिल्याचे पुढे आले आहे. मात्र, ते त्याच गावात का आले, यांचा तपास पोलिस घेत आहेत.

ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक आकाश साळुंखे, प्रवीण बर्गे, अमोल भोसले, गणेश सावंत, विनय मलवाल, आशिष भालेकर यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी