शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

राजापूरच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा वैशाली मांजरेकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 18:56 IST

दोन वेळा नगराध्यक्षपद भुषविण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला होता. राजापूर नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा बहुमानही त्यांच्याच नावावर आहे.

राजापूर  : राजापूर नगर परिषदेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा वैशाली विजय मांजरेकर यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने राहते घरी निधन झाले. त्या ५५ वर्षाच्या होत्या. मांजरेकर यांची प्रकृती गेले काही दिवस बरी नव्हती. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र आज, शुक्रवारी दुपारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यातच त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. काही महिन्यांपुर्वीच त्यांचे पती विजय मांजरेकर यांचेही निधन झाले होते.एक शांत, संयमी आणि मितभाषी व्यक्तीमत्व म्हणून त्या परिचित होत्या. पतीच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून सावरत असतानाच त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत मांजरेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्या असलेल्या मांजरेकर यांनी दहा वर्षे नगरसेवक म्हणून काम केले होते. या काळात दोन वेळा नगराध्यक्षपद भुषविण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला होता. राजापूर नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा बहुमानही त्यांच्याच नावावर आहे.त्या पहिल्यांदा २१ जुलै २००१ ते १६ डिसेंबर २००१ या सहा महिन्याच्या कालावधीसाठी पहिल्यांदा नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. नगर परिषदेच्या स्थापनेनंतर त्या पहिल्या महिला नगराध्यक्ष ठरल्या. त्यानंतर पुन्हा त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना २३ डिसेंंबर २०११ ते ७ मार्च २०१३ या कालावधीत नगराध्यक्षपद भुषविण्याचा बहुमान मिळाला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुर