शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

Waterfalls in Konkan: आंबोली धबधब्याने वर्षा पर्यटन बहरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 12:42 IST

पर्यटकांना आवर घालताना पोलिसांची दमछाक

- अनंत जाधव, सावंतवाडीआंबोली हे वर्षा पर्यटनासाठी ‘हाॅट स्पाॅट’ मानले जाते. धबधब्यांचा नजराणा तर पर्यटकांना खुणावत असतो. त्यामुळे आंबोली घाटातील धबधब्यांवर आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. उंच उंच धबधब्यांमुळे तर आंबोलीतील वर्षा पर्यटन बहरून जात असते.पावसाळ्यात आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी हजारो पर्यटक येत असल्याने प्रशासनाकडूनही अतिउत्साही पर्यटकांना लगाम घालण्यासाठी काही निर्बंध घातले आहेत. यातून काहीसा पर्यटकांचा हिरमोड होताना दिसतो. कारण शनिवारी व रविवारी आंबोलीत तुफान गर्दी असल्याने या गर्दीवर नियंत्रण ठेवताना पोलिसांची चांगलीच दमछाक होते. त्यामुळेच प्रशासनाकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत.आंबोली हा वर्षा पर्यटनाचा हाॅट स्पाॅट मानला जातो. पावसाळ्यात वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक हे आंबोलीत येतात. या पर्यटकांमध्ये विशेषत: कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांतील तर शेजारील बेळगाव, गोवा राज्यातूनही पर्यटक येत असतात. हे सर्व पर्यटक आपल्या खासगी गाड्या घेऊन येतात. आंबोलीतील धबधब्याकडे जाणारे रस्ते अरुंद असल्याने पार्किंगचा मोठा प्रश्न असतो. एकाचवेळी पर्यटकांच्या गाड्या आणि माणसे धबधब्यावर जायची म्हटली तर वाहतूक कोडींचा मोठा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळेच सहसा प्रशासन अवजड वाहने किंवा पर्यटकांची वाहने ही एकाच ठिकाणी पार्क करण्यास भाग पाडते. त्यामुळेच आंबोलीत वर्षा पर्यटनादिवशी वाहतूक कोंडी होताना दिसत नाही.आंबोली घाटक्षेत्रात तब्बल सात ते आठ छोटे-मोठे धबधबे आहेत. या सर्व धबधब्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. यापूर्वी मुख्य धबधब्यावर गर्दी होताना दिसत होती. पण आता पर्यटक इतर धबधब्यांचा आनंद लुटत असल्याने एकाच धबधब्यावर गर्दी होताना दिसत नाही. या सर्व धबधब्यांना प्रशासनाकडून वेगळाच ‘लूक’ देण्यात आला आहे. या धबधब्यांवर पर्यटकांसाठी खास शिडीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे धबधब्यावर चढलेला पर्यटक हळूहळू खाली येऊ शकतो, हे विशेष.

अतिउत्साही पर्यटकांना लगामआंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. या पर्यटकांना आवर घालताना पोलिसांची दमछाक होत असते. पण आता पर्यटकांसाठी नियमावली तयार करण्यात आली असून, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांना धबधब्यावर एन्ट्री ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अतिउत्साही पर्यटकांना लगाम लागला आहे.

माकडांना खाद्यपदार्थ दिल्यास कारवाईआंबोली घाटात मोठ्या प्रमाणात माकडे आहेत. या माकडांना पर्यटक आपल्याकडील खाद्यपदार्थ देत असतात. पण आता वन विभागाकडून माकडांना खाद्यपदार्थ दिल्यास दंड आकारण्यात येईल, असे फलक लावण्यात आल्याने यावर थोडे निर्बंध आले आहेत.

वन विभागाची खास मोहीमवन विभागाने घाटात कचरा टाकणाऱ्यांना वेगवेगळे दंड लावले आहेत. त्यामुळे घाटातील कचरा कमी झाला आहे. तसेच वन विभागाचे कर्मचारीही आंबोली घाटात ठाण मांडून असतात.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनtourismपर्यटन