शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

ज्यांना मते दिलीत ते कुठे गेले आता?, मंत्री उदय सामंतांचा सवाल; रत्नागिरीत वक्फ मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 12:09 IST

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आणि देशाचे संविधान बदलले जाणार आहे याबद्दल ज्यांनी तुमच्या मनात विष पेरले आणि ...

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आणि देशाचे संविधान बदलले जाणार आहे याबद्दल ज्यांनी तुमच्या मनात विष पेरले आणि त्यामुळेच तुम्ही ज्यांना मते दिलीत ते उद्धवसेना आणि काँग्रेसचे लोक आज कोठे आहेत, असा प्रश्न उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केला. वक्फ मंडळाच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग कार्यालयाचे उद्घाटन सामाजिक न्याय भवन येथे मंत्री सामंत यांच्या हस्ते झाले.उदय सामंत म्हणाले, तुम्हाला जसा मशिदीचा अभिमान आहे, तसा मला मंदिराचा अभिमान आहे. प्रत्येकाला तो असतो. पण, लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपण कधीही जातपात, धर्म पाहून काम करत नाही. मच्छीमार असोत किंवा अन्य कोणी, सर्वांच्या समस्या सोडविण्यावर माझा भर असतो. यावेळी त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. ज्यांना तुम्ही मते दिलीत, त्यांचा एकही पदाधिकारी, कार्यकर्ता वक्फ मंडळ कार्यालयाचे उद्घाटन होताना फिरकलासुद्धा नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

तुमच्या मनात मुद्दाम विष पेरण्यात आलेउदय सामंत म्हणाले, तुमच्या मनात मुद्दाम विष पेरण्यात आले आहे. आता मोदी पंतप्रधान होऊन बरेच दिवस झाले. एकतरी मुसलमान बांधव देशाबाहेर गेला का? तुमच्यामध्ये जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र, तसे काही मनात ठेवू नका. आपण तुमच्या समस्यांसाठी नेहमी उभे असू, असेही ते म्हणाले.

मंडळाचे काम सहा महिन्यांपूर्वीच सुरूआज मंडळाचे उद्घाटन होत असल्याचे जे लोक सांगत आहेत, त्यांचा अभ्यास थोडा कमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिलेल्या पाठबळामुळे मंडळ सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाले आहे. या कार्यालयातील अंतर्गत सजावटीचे काम आता पूर्ण झाले आहे. त्याचे उद्घाटन आज करण्यात आले, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतMuslimमुस्लीमcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना