शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

रत्नागिरी : प्रकल्प रद्द होईपर्यंत तुमच्या पाठीशी राहणार, राज ठाकरे यांची नाणारमधील प्रकल्पग्रस्ताना ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 14:42 IST

रिफायनरी प्रकल्प रद्द करायचा असेल तर सर्वांनी एकत्र रहावे लागेल. प्रकल्प रद्द करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानात ही गोष्ट नीटपणे घालेन. हा प्रकल्प रद्द होईपर्यंत मी तुमच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाणार येथील ग्रामस्थांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देराज ठाकरे म्हणाले, प्रकल्प रद्द होईपर्यंत तुमच्या पाठीशी राहणारराज यांची नाणारमधील प्रत्यक्ष प्रकल्प परिसरातील प्रकल्पग्रस्ताना ग्वाहीशनिवारी नाणार परिसराला दिली भेट

राजापूर : रिफायनरी प्रकल्प रद्द करायचा असेल तर सर्वांनी एकत्र रहावे लागेल. प्रकल्प रद्द करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानात ही गोष्ट नीटपणे घालेन. मी हाती घेतलेले कोणतेच काम अर्धवट ठेवत नाही. हा प्रकल्प रद्द होईपर्यंत मी तुमच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाणार येथील ग्रामस्थांशी बोलताना दिली.राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. तरीदेखील हा प्रकल्प होणारच असे विधान मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील बैठकीत केले आहे. त्यामुळे हा विरोध आणखीनच वाढला आहे.

ग्रामस्थांच्या विरोधानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभीमान पक्षानेदेखील ग्रामस्थांच्या पाठीशी राहण्याचा निर्णघ घेत प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र, याबाबत मनसेने आपली कोणतीच भूमिका स्पष्ट घेतलेली नाही.नाणार परिसरातील ग्रामस्थांनी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्याने आपण प्रत्यक्ष प्रकल्प परिसरातील ग्रामस्थांची भेट घेऊन आपली भूमिका मांडू असे जाहीर केले होते. त्यानुसार शनिवारी नाणार परिसराला भेट दिली.

यावेळी त्यांच्यासमवेत आमदार बाळा नांदगावकर उपस्थित होते. या भेटीदरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी आम्हाला हा प्रकल्प नको असे ठणकावून सांगितले. त्याचबरोबर मनसेने एक दणका देऊन हा प्रकल्प येथून हटवावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली.यावेळी राज ठाकरे म्हणाले की, कोकणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. कोकणी माणूस स्वस्त आहे, असा समज झाल्याने कोकणाच्या माथी असे प्रकल्प लादले जात आहेत.

कोकणची ताकद दाखवून द्या, या प्रकल्पाला कडाडून विरोध करा, मी तुमच्या पाठीशी आहे. मात्र, जर फूट पडतील तर मग ब्रह्मदेवही वाचवू शकणार नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. आज होला किंमत नाही तर जगात नाहीला किंमत आहे. त्यामुळे प्रकल्प नको या भूमिकेवर ठाम रहा, मनसे तुमच्या सोबत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRatnagiriरत्नागिरीkonkanकोकण