शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

नियमांचा भंग केल्यास कारवाई करूच : सुनील चव्हाण यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:07 IST

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्देनियमांचा भंग केल्यास कारवाई करूच : सुनील चव्हाण यांचे निर्देशकायद्याचे पालन करणाऱ्यांना सहकार्य करा

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारासह केवळ पाच लोकांना प्रवेश असेल. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उमेदवाराच्या वाहनासह इतर २ अशा केवळ तीनच वाहनांना प्रवेश देण्यात येईल, असे सांगितले.

निवडणुकीच्या काळात सर्वांनीच नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कायद्याचे पालन करणाऱ्या पोलिसांना सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले.यावर्षीची निवडणूक ही अ‍ॅपची निवडणूक असून, दिव्यांगांसाठी पीडब्ल्यूडी हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. दिव्यांगांना मतदान केंद्रांपर्यंत नेणे व परत सोडण्याची व्यवस्था प्रशासन करणार असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.नागरिकांना तक्रारी दाखल करण्यासाठी सी व्हिजिल हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अ‍ॅपवरून आतापर्यंत ७ तक्रारी दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते.

  1.  आतापर्यंत १९५४ शस्त्र जमा करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ३ जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. अजूनही ११ जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याबाबतचे प्रस्ताव आहेत. त्यावर दोन दिवसांत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच आतापर्यंत १०७ कलमानुसार ३४९, कलम १०९ अन्वये २७ आणि कलम ११० अन्वये ३८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 
  2. निवडणुकीच्या प्रचार सभांसाठी मैदान, रॅली, सभा, वाहने तसेच पोस्टर, बॅनर, बिल्ले यासंदर्भातील परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एक खिडकी सुरू करण्यात आली आहे. हे कार्यालय जुने तहसील कार्यालय येथे सुरू करण्यात आले असून, याठिकाणी नगरपरिषद, तहसील, परिवहन कार्यालय, गटविकास अधिकारी व पोलीस विभागाचे कर्मचारी असतील, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 
  3. लोकसभा निवडणुकीसाठी महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच जण महिला असतील. सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्र ह्यसखी मतदान केंद्रह्ण म्हणून ओळखली जाणार आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcollectorजिल्हाधिकारीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग