शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

भातशेतीबरोबर भाजीपाला उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:34 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे उंबरवाडी येथील माधव हरी भावे भातशेतीसह भाजीपाला उत्पादनासह जोडव्यवसाय म्हणून ‘दुग्ध व्यवसाय’ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे उंबरवाडी येथील माधव हरी भावे भातशेतीसह भाजीपाला उत्पादनासह जोडव्यवसाय म्हणून ‘दुग्ध व्यवसाय’ करीत आहेत. याशिवाय आंबा, काजू, कोकम, फणस या कोकणी मेव्यापासून विविध उत्पादनांची निर्मिती करून विक्री करीत आहेत. भातशेतीतून ५० गुंठे जमिनीतून २८८० किलो उत्पादन घेत आहेत.

माधव भावे सध्या ७० वर्षांचे आहेत. अकरावी मॅट्रिक झाल्यानंतर भावे यांनी नोकरीसाठी प्रयत्न न करता शेतीकडे लक्ष केंद्रित केले. गेली ४० वर्षे ते शेती व्यवसायात आहेत. वडिलोपार्जित जमिनीमध्ये भातशेती, त्यानंतर भाजीपाला, शिवाय उर्वरित जमिनीवर आंबा, काजू, नारळ, सुपारी लागवड केली आहे. सेंद्रिय उत्पादनावर विशेष भर असल्यामुळे त्यांच्याकडील भात, भाज्या तसेच फळांचा दर्जा तर चांगला आहे, शिवाय उत्पादकताही उत्तम आहे. पन्नास गुंठे जमिनीवर भाताचे उत्पादन घेत असून त्यांना पावणेतीन ते तीन हजार किलो भात उत्पादन प्राप्त होत आहे.

भात काढणीनंतर भाजीपाला लागवड करीत आहेत. बागायतीसह दूध व्यवसायातून उत्पन्न मिळवत आहेत. पारंपरिक पद्धतीने शेती करीत असताना, व्यावसायिकता जोपासली आहे. कमी जागेत जास्तीतजास्त उत्पादन ते मिळवत आहेत.

दुग्ध व्यवसायाची जोड

माधव भावे यांनी शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिली आहे. चार म्हशी व एका गायीचा सांभाळ केला असून शेतीसाठी नांगरणीकरिता बैलजोडी आहे. दररोज ते दूध रत्नागिरी शहरात जाऊन विक्री करीत आहेत. शेण व गोमूत्रापासून खत व जीवामृताची निर्मिती करीत आहेत. शेतीसाठी त्याचा वापर करीत असल्याने उत्पादन व दर्जा राखण्यात ते यशस्वी ठरले आहेत. सेंद्रिय शेतीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

मिरची उत्पादन

सर्व प्रकारच्या पालेभाज्यांसह कोथिंबीर, वांगी, चवळी, पावटा लागवड करीत आहेत. याशिवाय, लोणच्यासाठी लागणा-या गावठी हिरव्या मिरचीचे ते उत्पादन घेत आहेत. १०० ते १२० रुपये किलो दराने मिरची विकली जात असल्याने मिरची लागवडीतून चांगला फायदा होत असल्याचे सांगितले. गावठी वांगी तसेच लाल व तांबडी चवळी लागवड करून उत्पादन घेत आहेत. स्थानिक पातळीवरच विक्री होत आहे.

मका लागवड

दुभती सहा तर नांगरणीसाठी दोन मिळून आठ जनावरे आहेत. दुभत्या जनावरांना बारमाही ओला चारा मिळावा, यासाठी पावसाळ्यानंतर ते मका लागवड करीत आहेत. खाण्यासाठी मका उपलब्ध होतोच, शिवाय दुभत्या जनावरांसाठी पोषक खाद्य असल्याने दुधाचा दर्जा चांगला राहतो. शिवाय, दूधही भरपूर प्राप्त होते.

बागायतीतून उत्पन्न

भावे यांनी १७० काजू, १०० नारळ, २०० सुपारी, १० फणस व ५ आंबा कलमांची लागवड करून उत्पादन घेत आहेत. कोकमपासून सरबत, शिवाय फणसपोळी, आंबापोळी यासारखे उत्पादन घेऊन विक्री करीत आहेत. बागायतीबरोबर प्रक्रिया उत्पादनातून उत्पन्न मिळवत आहेत. चांगल्या दर्जामुळे विक्रीही हातोहात होते.