शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रत्नागिरीतील मालगुंड येथे धरणात बुडून युवकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 12:07 IST

गणपतीपुळे : धरणात पोहायला गेलेल्या युवकाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड मराठवाडी येथे गुरुवारी ...

गणपतीपुळे : धरणात पोहायला गेलेल्या युवकाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड मराठवाडी येथे गुरुवारी सायंकाळी घडली. पार्थ राजेंद्र राणे (१७, रा. दत्तमंदिर मागे, मालगुंड, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे.पार्थ हा रत्नागिरीतील फाटक महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिकत हाेता. गुरूवारी मालगुंड येथे आल्यानंतर तो आपल्या चार मित्रांसोबत सायंकाळी ४:३० वाजण्याच्या दरम्यान पोहण्यासाठी मालगुंड मराठवाडी येथील धरणात गेला होता. पार्थ व त्याचे मित्र धरणाच्या पाण्यात पोहत असताना पार्थ याला अचानकपणे अस्वस्थ वाटू लागल्याचे लक्षात आले. त्याला चक्कर आल्याने तो बुडू लागला. मित्रांच्या ही गाेष्ट लक्षात आल्यानंतर मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला ताबडतोब मित्रांनी व आजूबाजूला असलेल्या इतर तरूणांनी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

त्याला बेशुद्धावस्थेत आणल्यानंतर त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. अखेर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची पुन्हा तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. या घटनेचा पंचनामा जयगड पोलिस स्थानकाच्यावतीने मालगुंड गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक संदीप साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण, जयेश कीर व अन्य सहकाऱ्यांनी केला. याप्रकरणी जयगड पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद करण्यात आली आहे.

पार्थ हा त्याच्या आई-वडिलांचा अत्यंत लाडका मुलगा होता. ताे अत्यंत गुणी आणि हुशार असा मुलगा हाेता. त्याच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण मालगुंड गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात त्याचे आई-वडील, एक भाऊ व अन्य नातेवाईक असा परिवार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू