शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

Friendship Day 2018: समाज माध्यमांमुळे मैत्रीही झाली ‘ग्लोबल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 01:55 IST

जागतिकीकरणानंतर स्पर्धा निर्माण झाल्याने मनुष्याचे जीवन धावपळीचे बनले.

मुंबई : जागतिकीकरणानंतर स्पर्धा निर्माण झाल्याने मनुष्याचे जीवन धावपळीचे बनले. आप्तेष्टांसमवेत संवाद साधण्यासाठीही त्याला वेळ कमी पडू लागला. त्यामुळे नाती दुरावली. मात्र, इतर नाती दुरावली असली तरीही मैत्रीचे नाते कायमच त्याच्या जवळ राहिले आहे; कारण मैत्री हे एक असे नाते आहे, जे लोणच्यासारखे मुरत जाते आणि त्याला वेळ, काळ आणि जागेचे बंधन नसते. त्यामुळे ग्लोबलायझेशनच्या जमान्यात मैत्रीही ‘ग्लोबल’ झाली आहे.आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात ‘पत्रमित्राची’ जागा चॅटिंग रूमने घेतली आहे. व्हर्च्युअल फ्रेंडशिपने मैत्रीचे वर्तुळ अजून व्यापक बनत आहे. काही अपवाद वगळता या व्हर्च्युअल जगातील मैत्रीची ओढ तशीच टिकून आहे. आयुष्यात कधीही न पाहिलेल्या, न भेटलेल्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आपण स्वीकारतो आणि काही गप्पांमध्येच तो कधी आपला जवळचा मित्र होतो, हे कळतही नाही.काही दशकांपूर्वी ज्यांना काही कारणांमुळे शाळेतील मित्र-मैत्रिणींशी संपर्क राखता आला नाही, त्यांनाही या आधुनिक जगामध्ये पुन्हा एकत्र आणण्याचे व्यासपीठ सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाले आहे. मैत्रीचे सेतू उभारण्यासाठी आज अनेक साधने अक्षरश: हात जोडून उभी आहेत. फेसबुक, गुगल प्लस, टम्बलर, लिंक्डइन, टिष्ट्वटर, जीटॉक, व्हॉट्सअ‍ॅप-व्हॉइस चॅट, इन्स्टाग्राम अशी अनेक सोशल नेटवर्किंगची माध्यमे आज मैत्रीची माध्यमे झाली आहेत. त्यामुळे सध्याच्या जगात ‘मैत्री करा, मैत्री जपा, मैत्री वाढवा’ असा जणू मंत्रजागरच अखंड चालू आहे.जगाच्या दुसऱ्या कोपºयात असणाºया मित्राला आपल्या आनंदात सहभागी करून घ्यायचेय? मग त्याला फेसबुकच्या फोटोवर टॅग करा. एखादी विनोदी घटना त्याला सांगायची आहे? तर व्हॉट्सअ‍ॅप-व्हॉइस चॅटवरून त्याला मेसेज करा. तुम्ही काढलेले फोटो पिकासावर अपलोड करून त्याला दाखवा. हे सगळे क्षणार्धात होईल इतके आभासी जग तुमच्या-आमच्या जवळ सोशल मीडियाने निर्माण केले आहे.मैत्री टिकविण्याचे काम या सोशल नेटवर्किंग साइटवरून होत असले, तरीही ती मैत्री रुजते-फुलते आणि दृढ होते ती ‘वेव्हलेन्थ’ जुळल्यानंतरच. आधीच्या पिढीमध्ये मित्र रस्त्यावर, शाळेत, कॉलेजमध्ये, मैदानावर, घराच्या बाहेर भेटत होते. आता हेच मित्र आॅनलाइनच्या ‘व्हर्च्युअल’ जगामध्ये भेटतात. त्यांचे हे नवे कट्टे आणि नवे अड्डेच आहेत. मैत्री तीच, तिचे माहात्म्यही तेच; फक्त भेटण्याच्या जागा बदलल्या. रोज भेटून गप्पा मारण्याची जागा व्हॉट्सअ‍ॅपच्या चॅटबॉक्सने घेतली. इतकाच काय तो फरक, बाकी ये दोस्ती... आहेच की..!२0 वर्षांनंतरमित्र आले एकत्रसोशल मीडियाच्या माध्यमातून वांद्रे पूर्व येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९७६ सालच्या बॅचचे विद्यार्थी जोडले गेले आहेत. या सवंगड्यांनी शाळेत १ ली ते १० वीपर्यंतची १० वर्षे आनंदात घालवली आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देशविदेशात ते स्थायिक झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनही उत्साहात साजरे केले आहे.२००८ साली या विद्यार्थ्यांचे पहिले स्नेहसंमेलन साजरे झाले. त्यानंतर २०१२, २०१४, २०१५, २०१६, २०१७ आणि यंदा फेब्रुवारी महिन्यात वार्षिक स्नेहसंमेलन साजरे केले. स्नेहसंमेलनाला मुंबई, ठाणे, वसई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, हैदराबादसह अमेरिका, दुबई येथून मित्र-मैत्रिणी आवर्जून येतात.१९६६ ते ७६ चा शाळेतील काळ वेगळा होता. त्या वेळी मोकळे वातावरण नव्हते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आमच्या शाळेतील १९७६च्या बॅचचे सुमारे ९० माजी विद्यार्थी रोज संपर्कात असतो आणि एकमेकांची सुख-दु:खं वाटतो. शाळेतील लोकप्रिय माजी पर्यवेक्षक अनिल कुलकर्णीदेखील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाला हजर असतात, असे यापैकी एक असलेल्या आरती भाटकर यांनी सांगितले.

टॅग्स :MobileमोबाइलrelationshipरिलेशनशिपFriendship Dayफ्रेण्डशीप डे