शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत, हरयाणातील पराभवावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
3
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
4
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
5
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
6
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
7
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
8
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
9
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
10
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट
11
जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्तींच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात! गेल्या निवडणुकीपर्यंत होता सर्वात मोठा पक्ष, पण आता...
12
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
13
बाहेरुन स्पा सेंटर पण...! जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला; मुलांसह ५ मुली ताब्यात, Video Viral
14
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
15
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
16
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
17
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
18
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
19
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
20
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव

रोजच्या जीवनात असं काही घडत असेल तर तुम्हाला ब्रेकची आहे नितांत गरज!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 2:31 PM

Relationship Tips : सुरूवातीला तुम्ही एकमेकांना आवडत असता, पण नंतर नात्यातील गोडवा कमी होऊ लागतो. कारण तेव्हा तुम्ही एकमेकांना अधिक चांगले ओळखू लागता. जे आधी माहीत नसतं. अशात काही लोक आपलं नातं वाचवण्याचा प्रयत्न करतात.

Relationship Tips : जेव्हा दोन लोक सोबत येतात तेव्हा सुरूवातीला त्यांना एकमेकांबाबत फार कमी माहिती असते. हळूहळू समजतं की, समोरची व्यक्ती कशी आहे. असंही होऊ शकतं की, काही दिवसांनी तुमचं तुमच्या पार्टनरसोबत पटणार नाही. दोघांचे विचार-राहणीमान वेगळेही असू शकतात. इतरही गोष्टींमध्ये मतभेद असतील.

सुरूवातीला तुम्ही एकमेकांना आवडत असता, पण नंतर नात्यातील गोडवा कमी होऊ लागतो. कारण तेव्हा तुम्ही एकमेकांना अधिक चांगले ओळखू लागता. जे आधी माहीत नसतं. अशात काही लोक आपलं नातं वाचवण्याचा प्रयत्न करतात. तर काही लोक यात अपयशी ठरतात. दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होऊ लागतात. आयुष्य बोरिंग होतं. अशात असं नातं पुढे नेण्यापेक्षा वेगळे झालेले बरे...तुम्हाला ब्रेकची नितांत गरज कधी असू शकके याचे काही संकेत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1) तुम्ही सुट्टीवर असला तरी घरी असताना छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्हाला येणारा संताप किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमची होणारी चिडचिड हा तुम्हाला ब्रेकची गरज असल्याचा संकेत आहे. जरा शांत व्हा आणि विचार करा की, तुम्ही कसे जगताय. तेव्हा तुम्हाला याची जाणीव होईल.

2) रोज ऑफिसमधील बिझी शेड्युलमुळे तुम्हाला स्ट्रेसची किंवा स्ट्रेसमध्ये काम करण्याची सवय झालेली असते. स्ट्रेस हा तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग झालेला असतो. पण एक वेळ अशी येते की, तुम्ही जराही स्ट्रेस सहन करु शकत नाही. स्टे्सच्या नावानेही तुम्हाला चिड यायला लागते. कामाच्या ठिकाणी स्ट्रेस येणारच त्याला पर्याय नाही. पण त्यातून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला एका मोठ्या ब्रेकची गरज आहे, असे समजा. 

3) नेहमीची लोकं आणि नेहमीची ठिकाणं जेव्हा तुम्हाला बोरींग वाटायला लागतात, तेव्हा तुम्हाला ब्रेकची गरज आहे असे समजा. नेहमीची लोकंच कशाला तुमच्या आवडीची ठिकाणंही तुम्हाला कधी कधी नकोशी वाटतात. असे का होते आहे याचा विचार तुम्ही करायला हवा. जगण्याला एकांगीपणा आल्यावर असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

4) ब-याचदा तुम्ही तुमच्या मित्रांकडून किंवा सहकाऱ्यांकडून ऐकलं असेल की, तुला ब्रेकची गरज आहे. ते असे का म्हणाले असतील याचा विचार करा. त्यांना नक्कीच असं काहीतरी माहीत असेल किंवा जाणवलं असेल म्हणूनच ते असं म्हणाले असतील ना! मग त्याचा विचार कराच.

5) जर तुम्ही सतत आजारी पडत असाल किंवा सतत तुम्हाला कशाचा ना कशाचा त्रास होत असेल. तर तुम्हाला नक्कीच एका ब्रेकची गरज आहे. 

6) सगळं काही ठीक सुरु असतानाही, घरी कोणतही भांडण नसतानाही किंवा सहकाऱ्यांचा कोणताही त्रास नसतानाही तुमचं कामात मन लागत नसेल. अनेकदा महत्वाची कामे असूनही तुम्हाला त्यात इंटरेस्ट येत नसेल, तर ब्रेक तो बनता है बॉस....

7) घरी बायको बरोबर तुमची सतत काहीना काही कारणावरुन भांडणं होत असेल, तिच्या छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही चिडचिड करत असाल तर नक्कीच काहीतरी बिनसलंय. अशात तुम्हाला ब्रेकची गरज आहे. दोन चार दिवस कुठेतरी बाहेर फिरुन या. नेमकं काय होतंय याचा विचार करा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप