शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'या' राशींचं एकमेकांशी अजिबात पटत नाही; लगेच होऊ शकतं ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 11:52 IST

अनेक कपल्सचं नातं फार सुंदर असतं, पण काही कपल्सचे स्वभाव जुळत नाही, तर सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडत राहतात. अशातच कपल्समध्ये काही गोष्टी योग्य पद्धतीने सुरू राहत नाहीत.

अनेक कपल्सचं नातं फार सुंदर असतं, पण काही कपल्सचे स्वभाव जुळत नाही, तर सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडत राहतात. अशातच कपल्समध्ये काही गोष्टी योग्य पद्धतीने सुरू राहत नाहीत. त्यावेळी नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. एवढचं नाहीतर नातं तुटण्याचीही शक्यता निर्माण होते. असं होण्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, दोघांचा स्वभाव किंवा पर्सनॅलिटी फार वेगळी असते. 

असं सांगितलं जातं की, आपला स्वभाव काही राशींवरून समजणं शक्य असतं. आज आम्ही तुम्हाला अशाच काही राशींबाबत सांगणार आहोत. ज्यांचं एकमेकांशी अजिबात पटत नाही.  तसेच जर अशा राशींच्या व्यक्ती एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार करत असतील तर त्यांच्या नात्यामध्ये अनेक चढ-उतार येऊ लागतात. जाणून घेऊयात अशाच काही राशींबाबत... 

नात्यामध्ये येण्याआधी कोणीही राशींचा फारसा विचार करत नाही. परंतु, नातं पुढे नेण्यासाठी आणि नात्यामधील भांडणांपासून बचाव करण्यासाठी राशी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक असतं. असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.

जाणून घेऊया कोणत्या राशीच्या जोड्यांचं नातं जास्त वेळापर्यंत टिकू शकत नाही. 

मेष राशी आणि कर्क राशी 

मेष राशीच्या व्यक्ती पारच केअरिंग असतात. या व्यक्ती सतत एखाद्या गोष्टीची काळजी करत बसतात. पण याउलट कर्क राशीच्या व्यक्ती सतत आपल्याबाबतच विचार करत असतात. असं सांगितलं जातं की, याच कारणामुले या दोन्ही राशींच्या व्यक्तींमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरून खटके उडत असतात. अनकेदा ही भांडणं नातं तुटण्यासही कारणीभूत ठरतात. 

(Image Credit : Cooperative Therapy)

वृषभ राशी आणि सिंह राशी

असं सांगितलं जातं की, या दोन्ही राशींच्या व्यक्ती मर्यादेपेक्षा जास्त रागीट असतात. यांच्या नात्यामध्ये भांडण होण्याची सर्वा मोठी कारणं म्हणजे, यांचा हट्ट आणि अहंकार. जेव्हा दोन्ही व्यक्तीं रागात असतात. त्यावेळी कोणीही एकमेकांचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतं. त्यामुळे या दोन राशींच्या व्यक्तींचं नातं फार काळ टिकत नाही. 

(Image Credit : iStock)

मिथुन राशी आणि कन्या राशी

कन्या आणि मिथुन राशीच्या व्यक्तींची पर्सनॅलिटी एकमेकांपेक्षा वेगळी असते. असं सांगितलं जातं की, कन्या राशीच्या व्यक्ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करतात. याउलट मिथून राशीच्या व्यक्तींना प्रत्येक बाबतीत स्वातंत्र्य पाहिजे असतं. त्यामुळे यांचा ताळमेळ अजिबात बसत नाही आणि दोघेही वेगळं होण्याचा विचार करतात. 

(Image Credit : Healthista)

कर्क राशी आणि तूळ राशी 

कर्क राशीच्या व्यक्तींना इतरांची काळजी घ्यायला फार आवडते. परंतु, तूळ राशीच्या व्यक्तींना त्यांचं असं वागणं म्हणजे, त्यांच्यावर केलेली जबरदस्ती वाटत असते. त्यामुळे त्यांचं नातं आपली ओळख निर्माण करू शकत नाही. 

(Image Credit : Mike & Susan Dawso)

मकर राशी आणि तूळ राशी

मकर राशीच्या व्यक्तींना अनावश्यक गोष्टींबाबत चर्चा करायला अजिबात आवडत नाही. तसेच तूळ राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीचा आनंद अनुभवणं फार आवडतं. असं सांगितलं जातं की, स्वभाव अगदी विरूद्ध असल्यामुळे या राशीच्या लोकांचं नातं फार काळ टिकू शकत नाही. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दाव करत नाही.)

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यRelationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व