शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

मिरज तालुक्यात १0८ संस्थांची नोंदणी रद्द

By admin | Published: April 17, 2016 10:54 PM

अवसायनातही अव्वल : वाळवा तालुका दुसऱ्या क्रमांकावर

सांगली : सहकार विभागाच्या मोहिमेत जिल्ह्यात एकूण ९४२ सहकारी संस्था बिनकामी निघाल्या आहेत. यातील एकूण ५४३ संस्था अवसायनात काढताना ४२६ संस्थांची नोंदणी रद्द केली आहे. तालुकानिहाय आकडेवारीही आता संकलित झाली असून अवसायनात निघालेल्या आणि नोंदणी रद्द झालेल्या सर्वाधिक संस्था मिरज तालुक्यातील असून, वाळवा तालुका याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सहकार विभागाच्या सर्वेक्षण मोहिमेत पहिल्या टप्प्यात ३३४ संस्था बंद अवस्थेत, ३०४ संस्था कार्यस्थगित असलेल्या, तर १२१ संस्था जागेवरून गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी जिल्ह्यातील या संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी ३९९ संस्था अवसायनात निघाल्या होत्या. त्यामध्ये आणखी ५४३ संस्थांची भर पडल्याने, ही संख्या ९४२ वर गेली. अवसायनात गेलेल्या ज्या संस्थांच्या चालकांनी सहकार विभागाशी कोणताही संपर्क केला नाही, याशिवाय त्यांचा शेवटपर्यंत शोध लागला नाही, अशा संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला. जिल्ह्यातील अशा ४२६ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. उर्वरित ५४३ संस्था अवसायनात असून त्यातील आणखी काही संस्थांची नोंदणीही रद्द होऊ शकते. या मोहिमेअंतर्गत प्रशासनातील आणि लेखापरीक्षण विभागातील ५४ जणांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने ३० सप्टेंबर २०१५ ला सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर केला. त्यानुसार जिल्ह्याचा एकत्रित अहवाल आता तयार करण्यात आला होता. यामध्ये ४०८९ पैकी केवळ ३ हजार ३३० संस्थाच चालू स्थितीत आढळून आल्या होत्या. त्यामुळे उर्वरित संस्था अवसायनात काढण्यात आल्या होत्या. या मोहिमेत ज्या सहकारी संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळून येणार नाहीत किंवा ज्यांचा कोणताही ठावठिकाणा नाही, त्यांच्यासंदर्भात जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून त्या संस्था बंद असल्याबाबतची खातरजमा करण्यात आली. (प्रतिनिधी)