शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Sangli: अतिवृष्टी, पुरामुळे पिकांचे ११ कोटींचे नुकसान; शेतकऱ्यांना भरपाई मिळणार कधी?

By अशोक डोंबाळे | Published: September 13, 2024 2:10 PM

शासनाला अहवाल पाठवला 

सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या धुवाॅंधार पावसामुळे मिरज, पलूस, वाळवा, शिराळा तालुक्यांतील सहा हजार १६७.४७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे १० कोटी ९२ लाख ९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे पाठवला आहे. शासनाकडे नुकसानाचा अहवाल पाठवला असला, तरी शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाने बुधवारी राज्य शासनाला अहवाल पाठवला आहे. अतिवृष्टी, कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मिरज, शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यांमध्ये भाजीपाला, पपई, सोयाबीन, भुईमूग, भात, हळद, मका, केळी आदी पिकांचे नुकसान झाले आहे.यामध्ये चार तालुक्यांतील १६ हजार ९९९ शेतकऱ्यांचे सहा हजार १५९.२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी १० कोटी ९२ लाख ९ हजार रुपयांची गरज आहे. यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्या सहीने बुधवारी शासनाकडे पाठवला आहे.

सर्वाधिक फटका चार तालुक्यांमध्ये (क्षेत्र हेक्टरमध्ये)तालुका -  शेतकरी - संख्या क्षेत्र - नुकसान रक्कममिरज - ४०३२ -  २५८८.९० - ४.४१ कोटीवाळवा - ६१९३ - १६४९.०१ -  ३.६० कोटीशिराळा - ५५०२ - १७१८ - ३.९० कोटीपलूस - १२७२ - २०३.३४ ० - ०.३४ कोटी

कोणत्या पिकांचे नुकसानमिरज : सोयाबीन, भाजीपाला, भुईमूग, ऊस, भात, मका, हळद, पपई, केळी.वाळवा : सोयाबीन, भाजीपाला, भुईमूग, ऊस, भात, मका, हळद, पपई.पलूस : सोयाबीन, भाजीपाला, ऊस, मका.शिराळा : ऊस, भात.

अशी मिळणार भरपाईबाधित पिकाखालील शेतीला हेक्टरी १७ हजार रुपये तर फळपिकांना हेक्टरी २२ हजार ५०० रुपये शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

फळपिकांचे अत्यल्प नुकसानशिराळा, वाळवा, मिरज आणि पलूस तालुक्यांतील ३६ शेतकऱ्यांच्या आठ हेक्टर २२ गुंठे फळपिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी दोन लाख ३३ हजार रुपये निधीची गरज आहे. या निधीची मागणी शासनाकडे केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीfloodपूर