शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

‘चांदोली’त १२.३६ टीएमसी पाणीसाठा

By admin | Published: April 25, 2016 11:30 PM

वीज निर्मिती बंद : वारणा नदीत १८२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

वारणावती : चांदोली धरणामध्ये १२.३६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, कर्नाटकला एक टीएमसी पाणी द्यायचे असल्याने धरणातून १८२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. पाणीसाठा कमी झाल्याने वीज निर्मिती रविवारी सायंकाळी पाचपासून बंद करण्यात आली आहे. धरणामध्ये शिल्लक असणारे पाणी जूनपर्यंत पुरेल, असा अंदाज धरण प्रशासनाने व्यक्त केला आहे.शिराळा तालुक्याच्या पश्चिम टोकावर असणारे चांदोली धरण, दुष्काळी भीषण परिस्थितीत वरदान ठरत आहे. पावसाळ्यात या धरणात ३४ टीएमसी पाणीसाठा झाला होता. सिंचनासाठी पाण्याचा वापर कालव्यातून व वारणा नदीतून केला जातो. आजपर्यंत २२ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे, तर १२.३६ टीएमसी पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. येत्या चार-पाच दिवसात कर्नाटकला लागणारे एक टीएमसी पाणी देण्याचे नियोजन पूर्ण होईल. त्यानंतर सुमारे १२०० ते १३०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू राहील. एवढ्या विसर्गाने पाणी सोडले तरीही, धरणातील पाणी जूनपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा ५.४५ टीएमसी आहे. त्यामुळे सुमारे सात टीएमसी पाणी वापरता येणार आहे. धरणाची पाणी पातळी ५९९.४५ मीटर असून ३४९.१७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ३४.८४ टक्के आहे.धरणाच्या पाण्यावर वीजनिर्मिती करणारी १६ मेगावॅट वीज निर्मितीची दोन जनित्रे आहेत. धरणातील पाणी पातळी कमी झाल्याने ही दोन्ही जनित्रे रविवारी सायंकाळपासून बंद केली आहेत. मुख्य कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद करून धरणातून १८२० क्युसेक्सचा निसर्ग वारणा नदीत सोडला. कर्नाटकसह दुष्काळी भागाला चांदोली धरण वरदान ठरत आहे. (वार्ताहर)