शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चांदोली धरणातून पाण्यासाठी हवेत १५०० कोटी, मदनभाऊ युवा मंच आक्रमक

By शीतल पाटील | Updated: December 2, 2023 13:50 IST

वारणा नदी की धरण वाद पेटणार

शितल पाटील

सांगली : सांगली व कुपवाड शहराला चांदोली धरणातून पाणी मिळावे, की वारणा नदीतून हा वाद नजीकच्या काळात चांगलाच पेटणार आहे. चांदोली धरणातून पाणी आणण्यासाठी जवळपास १,५०० कोटीची गरज भासणार आहे. याशिवाय देखभाल दुरूस्तीचा प्रश्न वेगळाच आहे. त्याऐवजी वारणा नदीतून पाणी देण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मदनभाऊ युवा मंचाने आक्रमक भूमिका घेतली आहे.कृष्णा नदी कोरडी पडत आहे. शिवाय कृष्णेच्या प्रदूषणात वाढ झाल्याने २००६ साली तत्कालीन मंत्री मदनभाऊ पाटील यांनी वारणा पाणी योजना आखली होती. पण, त्यानंतर महापालिकेत सत्ताबदल झाल्याने वारणा नदीतून पाणी उचलण्याची योजना बारगळली. आता पुन्हा या योजनेची गरज भासू लागली आहे. त्यासाठी मदनभाऊ युवा मंचाने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. समडोळी येथून वारणा नदीतून पाणी उपसा केले जाणार होते. पण समडोळीकरांनी विरोध केल्याने आता हरिपूर हद्दीतून पाणी उचलण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.अनेक अडथळे त्यात नागरिक जागृती मंचाने चांदोली धरणातून पाणी आणण्याची मागणी लावून धरली आहे. पण त्यासाठी येणारा खर्च पाहता धरणातून पाणी सांगलीकरांच्या दारापर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे आहेत. जवळपास १०० किलोमीटरहून पाणी आणावे लागणार आहे. त्यासाठी शासनाकडून निधी मिळणार का? हा खरा प्रश्न आहे. त्याऐवजी १० किलोमीटरवर असलेल्या वारणा नदीतून पाणी उचलून सांगली व कुपवाडला देणे संयुक्तिक ठरणार असल्याचे मतही काही तज्ज्ञांनी व्यक्त केले.

वारणेसाठी २७० कोटीवारणा नदीतून पाणी उपसा करण्यासाठी २७० कोटीचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे. त्यात १० किलोमीटरची साडेतीन फूट पाइपलाइन, दोन टंकवेल, एक जॅकवेल, बारा ठिकाणी पाण्याच्या टाक्या, गावठाणमध्ये जुन्या जलवाहिन्या बदलण्यासह कृष्णा नदीवर छोटा पूल उभारणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

चांदोलीसाठी १,५०० कोटीसांगली ते चांदोली धरणापर्यंतचे अंतर जवळपास ११० ते ११७ किलोमीटर आहे. प्रत्येक किलोमीटरला ९ कोटीचा खर्च धरला तर जवळपास १,०५३ कोटी रुपये केवळ पाइपलाइनसाठी लागतील. याशिवाय विविध परवाने, सर्वेक्षण, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई हा खर्च पाहता ही योजना दीड हजार कोटीपर्यंत जाऊ शकते.

महापालिकेवर आर्थिक भारवारणा पाणी योजनेसाठी महापालिकेवर ८१ कोटींचा बोजा पडणार आहे. तर चांदोलीतून पाणी आणण्यासाठी जवळपास ४०० कोटींचा भार पालिकेवर येईल. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता ४०० कोटी रुपयांचा हिस्सा देणे अशक्यप्राय आहे.

पाण्याचा हार्डनेस किती?सध्या महापालिका कृष्णा नदीतून पाणी उचलते. या पाण्याचा शुद्धीकरणानंतरचा हार्डनेस २८४ ते ३५० दरम्यान आहे. महापालिकेने अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. तेथील पाणी जुन्या जलशुद्धीकरण केंद्रापेक्षा चांगले आहे. वारणा नदीच्या पाण्याचा हार्डनेस ७६ इतका आहे. कृष्णेपेक्षा वारणेचे पाणी शुद्ध आहे. त्यामुळे वारणा नदीतून पाणी उचलणेच योग्य ठरणार आहे.

चांदोली धरणातून पाणी आणण्याच्या योजनेला आमचा विरोध नाही. परंतु, तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या या योजनेत अनेक अडचणी आहेत. शहरातील जलवाहिन्यांची गळती काढण्यासाठी महापालिकेकडे कामगार नाहीत, तिथे धरणातून आलेल्या जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती होईल का, याचा विचार करावा. धरणातून पाणी आणण्यासाठी किती वर्षे जातील, याचा नेम नाही. काही जण वारणा योजना होऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. या योजनेला खो बसल्यास त्या पापाचे धनी कोण? वारणा योजना मदनभाऊंच्या नावे असल्याने काहींना पोटशूळ आहे. या झारीतील शुक्राचार्यांनी चांदोली धरणातून पाणी आणण्याची योजना कधी पूर्ण होणार हे जाहीर करावे. - आनंद लेंगरे, जिल्हाध्यक्ष, मदनभाऊ युवा मंच.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी