शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
2
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
3
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
4
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
5
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
6
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
7
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
8
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
9
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
10
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
11
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
12
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
13
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?
14
Irani Cup 2024 : अजिंक्य की ऋतुराज? MUM vs ROI मॅच ड्रॉ झाली तर कोण उचलेल ट्रॉफी?
15
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
16
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
17
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
18
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
19
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
20
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना

अवकाळी पावसामुळे १६५५९ हेक्टर पिकांचे नुकसान; शेतकरी चिंतेत

By अशोक डोंबाळे | Published: December 13, 2023 5:19 PM

प्रशासनाकडून शासनाकडे अहवाल सादर ,सर्वाधिक फटका द्राक्ष, डाळींब, आंबा, केळी फळपिकांना

अशोक डोंबाळे,सांगली : पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ३२ हजार ७८२ शेतकऱ्यांच्या १६ हजार ५५९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, डाळींब, आंबा, केळी फळपिकांसह रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अंदाजाचा अहवाल प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. या नुकसानीमध्ये सर्वाधिक फटका फळपिकांना बसला आहे.

जिल्ह्यात दि.२६ नोव्हेंबर ते दि.१ डिसेंबर या कालावधीत संततधार पाऊस झाला होता. ढगाळ हवामानही असल्यामुळे द्राक्ष, डाळिंब पिकाला सर्वाधिक फटका बसला होता. काही द्राक्षांचे मणी सडल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. यामध्ये शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी आणि संघटनांच्या दबावामुळे कृषी विभागाने तातडीने नजर अंदाजचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील सर्वाधिक नऊ हजार ७९२ शेतकऱ्यांचे जिरायत पिकाचे ७६० हेक्टर, बागायत पिकाचे १८७ हेक्टर, फळपिकांचे चार हजार ४८७ हेक्टरचे नुकसान झाले आहे. वाळवा तालुक्यातील दोन हजार २५० शेतकऱ्यांचे ८०८.९५ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, भाजीपाला, केळीच्या भागांचे नुकसान झाले.

पलूस, तासगाव, कडेगाव, खानापूर, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील पिकांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अंदाजचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. पण, शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात कधी मिळणार, असा सवालही शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी