शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

सांगली जिल्ह्यात १८६ हेक्टरवर वळवाचा फटका, कृषी मंत्र्यांकडून पंचनाम्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:48 IST

रब्बी पिकासह आंबा, द्राक्षाला फटका 

सांगली : जिल्ह्यात पाच दिवसापासून झालेला वळीव पाऊस व गारपिटीचा फटका शेत पिकांना बसला आहे. जिल्ह्यातील ५६ गावांमधील १८६.०८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, यात सर्वाधिक नुकसान तासगाव, जत, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यात झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात दोन हजार शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक वाया गेले आहे. द्राक्ष, आंबा, डाळिंब यासह रब्बी हंगामातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले.सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून वळीव पाऊस झाल्याने शेतमालाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. मिरज, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, वाळवा तालुक्यात रब्बी पिकांसह द्राक्ष, बेदाण्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो एकर केशर आंबा लागवड झालेली आहे. काही भागात फळ धरण्यास सुरुवात झालेली आहे, तर काही भागातील केशर आंबा बाजारपेठेत येण्यासाठी काही दिवस बाकी असतानाच अवकाळी पावसाने दणका दिल्याने आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनास दिले. जिल्ह्याच्या अनेक भागात मेघगर्जनेसह उन्हाळी पावसाने हजेरी लावत चांगलेच झोडपून काढले. गारपिटीसह मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. उन्हाळी पावसाचा जिल्ह्यातील ५६ गावांना झोडपले. या वादळी पावसामुळे महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. जवळपास २० ते २५ खांब पडल्यामुळे तारा तुटल्या आहेत. परिणामी वादळी पावसाचा महावितरणला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

वळीव पावसामुळे पिकांचे नुकसानतालुका - शेतकरी - क्षेत्रमिरज - ८९ - ४९.३५तासगाव - १११ - ५२.९०क.महांकाळ - १२ - ७.५०वाळवा - ४६ - ३७.७०खानापूर - २९ - ११.८३जत - ३३ - २४.२०एकूण - ३२१ - १८६.०८

वळीव पावसामुळे असे झाले नुकसान

  • बाधित गावे : ५६
  • जिरायत पिकांचे नुकसान : १.८० हेक्टर
  • बागायत पिकांचे नुकसान : २८.०५ हेक्टर
  • फळपिकांचे नुकसान : १५६.२३ हेक्टर
  • एकूण पिकांचे नुकसान : १८६.०८ हेक्टर
  • बाधित शेतकरी संख्या : ३२१
टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसfarmingशेतीFarmerशेतकरी