शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

दुष्काळी भागातील दहावी, बारावीच्या २३ हजार विद्यार्थ्यांना एक कोटी रुपये परीक्षाशुल्क परत मिळणार

By संतोष भिसे | Published: May 16, 2024 7:34 PM

सांगली : टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यात ...

सांगली : टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यात २३ हजार विद्यार्थ्यांना एक कोटींहून अधिक रक्कम परत मिळणार आहे. 

शासनाने गतवर्षी राज्यात कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये तसेच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे या तालुक्यांतील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार आहे. सध्या त्याची प्रक्रिया सुरु आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. इतर काही तालुक्यांतील १०२१ महसूल मंडलांत दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ३९ महसुली मंडलांचा समावेश आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या माध्यमिक शालांत (दहावी) व उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेस बसलेल्या या मंडलांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सवलतीचा लाभ मिळेल.

दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८० रुपये, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे शुल्क परत मिळणार आहे. हे पैसे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये आरटीजीएसद्वारे जमा करण्यात येणार आहेत. पात्र विद्यार्थ्यांची माहिती शासनाने परीक्षा मंडळांकडे मागितली आहे. मंडळाने जिल्हा परिषदांकडे व जिल्हा परिषदेने जिल्हाभरातील माध्यमिक शाळांकडून माहिती मागवली आहे. सध्या ही प्रशासकीय प्रक्रिया सुरु आहे. ती पूर्ण होताच विद्यार्थ्यांच्या खात्यांवर पैसे जमा होणार आहेत.

जिल्ह्यातील ३९ महसूल मंडलांतील विद्यार्थीजिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ३९ महसूल मंडलांत दुष्काळाच्या सवलती लागू आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील पाच, वाळव्यातील ११, जतमधील नऊ, तासगावमधील सात, पलूसमधील चार आणि आटपाडीमधील तीन मंडलांचा समावेश आहे. तेथील विद्यार्थी संख्या २३ हजार २१७ असून त्यांना एक कोटी १३ लाख ३८ हजार ९०० रुपये परत मिळतील. 

दहावीचे लाभार्थी विद्यार्थीलाभार्थी शाळा    लाभार्थी विद्यार्थी   प्रतिपूर्तीची रक्कम२५२              १३२२८           ६३,४९,४००

बारावीचे लाभार्थी विद्यार्थीलाभार्थी शाळा    लाभार्थी विद्यार्थी   प्रतिपूर्तीची रक्कम९२                  ९९८९            ४९,८९,५०० 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाexamपरीक्षा