शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

राज्यातील २५ कुटुंबांकडे २०० साखर कारखान्यांची मक्तेदारी, रघुनाथदादा पाटील यांचा आरोप 

By अशोक डोंबाळे | Published: June 24, 2023 3:34 PM

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी २६ जूनला सांगलीत शेतकरी संघटनेचा मेळावा

सांगली : राज्यातील २५ कुटुंबांकडेच २०० साखर कारखान्यांची मक्तेदारी असल्यामुळे ते ऊस उत्पादकांची संघटित पिळवणूक करत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केला. तसेच या साखर सम्राटांना धडा शिकविण्यासाठी साखर कारखाना आणि इथेनॉलसाठी २५ किलोमीटर अंतराची अट शासनाने शिथिल केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी दि. २६ जून रोजी सांगलीत शेतकरी मेळावा आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले.रघुनाथदादा पाटील म्हणाले, साखर कारखाना आणि इथेनॉल प्रकल्प उभा करण्यासाठी शासनाने अंतराची अट घातली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. म्हणूनच २५ किलोमीटर अंतराची अट रद्द करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश, गुजरात राज्यांप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचा दर मिळण्यासाठी शिल्लक असलेला एकच पर्याय आहे तो म्हणजे दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द करणे.ऊस तोडणी मशिनसाठी प्रति टन ४११ रुपये दिले जातात आणि ऊसतोड मजुरांना २३० रुपये प्रति टन दिले जात आहेत. मशिनप्रमाणे ऊसतोड मजुरांनाही ४११ रुपये द्यावेत. तसेच गोपिनाथ मुंडे महामंडळासाठी ऊस उत्पादकांकडून प्रति टन १० रुपये कपात केली जात आहे, ती रद्द केली पाहिजे. शासनाने महामंडळाला थेट मदत करण्याची गरज आहे. शेती करताना ग्रामस्थांना वन्यप्राण्यांचा त्रास होत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भागात बिबट्याचे वास्तव्य आहे. बिबट्याने जनावरांवर व माणसांवर हल्ले केले आहेत. मूळच्या भारतीय संविधानात वन्यप्राणी संरक्षण कायदा नव्हता. नव्याने कायदा केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शिकारीवरील बंदी उठली तरच शेती करणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे शेतकरी आर्थिक संकटातशेतकऱ्यांच्या मुळावर असलेला गोवंश हत्याबंदी कायदा मुळापासून संपवला पाहिजे. याबद्दलही शेतकरी संघटनेकडून हा कायदा लागू झाल्यापासून आजपर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांत जनजागरण सभा, मोर्चे शेतकरी, दलित, कुरेशी यांना घेऊन हा कायदा रद्द करण्याबाबत खटाटोप चालू आहे. गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून शेतकरी ते विविध उद्योग करणाऱ्यावर बंधने आली आहेत. राजकीय पक्षांकडून मताच्या राजकारणासाठी या कायद्याचा उपयोग होत आहे. जर कायदा रद्द झाला नाही तर जनावरांची संख्या अत्यंत कमी होईल, असेही रघुनाथदादा पाटील म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने