शहरं
Join us  
Trending Stories
1
निलंबित PSI रणजीत कासले पुण्यात दाखल; निवडणुकीत गप्प राहण्यासाठी कराडने पैसे दिल्याचा आरोप
2
IPL 2025 MI vs SRH : वानखेडेच्या खेळपट्टीनं रंग बदलला; पण MI नं विजयाचा ट्रॅक नाही सोडला!
3
परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले
4
तात्पुरता दिलासा की क्लीन चिट? ससूनच्या चार पानी अहवालात दीनानाथ रुग्णालय, डॉ. घैसास यांच्यावर ठपका नाही
5
MI vs SRH : ३०० धावसंख्येची भविष्यवाणी करुन फसला माजी क्रिकेटर; आता शब्दांचा खेळ, म्हणाला...
6
दूतावासामधून तक्रार, सरकारने जेएनयूच्या ज्येष्ठ प्राध्यापकांना तातडीने केलं बरखास्त, केलं होतं धक्कादायक कृत्य
7
“हिंदी सक्तीने लादणे हा मराठीवर अन्याय, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला”: विजय वडेट्टीवार
8
पांड्याचं सेलिब्रेशन झालं! हेडनं मान खाली घालून पॅव्हेलियनचा रस्ता धरलेला अन् 'सायरन' वाजला
9
वेलांटी, मात्रा चुकल्याने बोगसपणा उघड; शिक्षण घोटाळ्यात बोगस कागदपत्रे बनविणारा अखेर सापडला
10
भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष वयाच्या ६१ व्या वर्षी बांधणार लग्नगाठ, पक्षाच्या महिला कार्यकर्तीसोबत अडकणार विवाह बंधनात
11
अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...
12
…तर ते कागद दाखवावे लागतील?, नव्या ‘वक्फ’ कायद्यावरील सुनावणीत ती मेख, केंद्र होणार खूश   
13
देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा २०२४ च्या विजयाला आव्हान; हायकोर्टाने समन्स बजावले
14
आयटेलचा 'एआय'वाला ए९५ स्मार्टफोन लाँच; १०,००० च्या आत किंमत...
15
IPL 2025 MI vs SRH : काय करायचं त्या बॉलरनं? दीपक चाहरनं जोर लावला! पण...
16
VIDEO: परप्रांतीय विक्रेत्याने गटारात धुतले ताडगोळे; खेडमधील किळसवाणा प्रकार
17
बॉम्ब हल्ला प्रकरणात लष्कराच्या जवानाला अटक; गँगस्टरला इंस्टाग्रामवरुन दिले ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण
18
आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू;अजित पवारांच्या स्वागतफलकाबाबत रोहित पवारांनी केला खुलासा
19
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
20
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा

कारगिलमधील वीर पुत्रांच्या बलिदानाला २५ वर्षे पूर्ण; सांगली जिल्ह्यातील सुरेश चव्हाण, महादेव पाटील यांना वीरगती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:49 IST

सांगली : सांगली जिल्हा म्हणजे क्रांतिकारकांची भूमी. स्वातंत्र्य चळवळीत अनेकांनी प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही सांगली सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला ...

सांगली : सांगली जिल्हा म्हणजे क्रांतिकारकांची भूमी. स्वातंत्र्य चळवळीत अनेकांनी प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही सांगली सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आजवर जिल्ह्यातील १६० सुपुत्र भारतमातेचे रक्षण करताना शहीद झाले. सद्य:स्थितीत जवळपास २० हजार सैनिक सैन्यदलात कार्यरत आहेत, तर तेवढेच माजी सैनिक आहेत. याच जिल्ह्यातील करोली टी (ता. कवठेमहांकाळ) चे जवान सुरेश चव्हाण आणि वडगाव (ता. तासगाव) चे महादेव पाटील हे १९९९ च्या कारगिल युद्धात शहीद झाले. त्यांच्या युद्धातील पराक्रमाला २५ वर्षे झाली. या वीर पुत्रांचे बलिदान आजही स्मरणात राहते.१९९९ च्या मे महिन्यात पाकिस्तानी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली. कारगिल भागावर अतिक्रमण केले. पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्यासाठी तब्बल ६० दिवस युद्ध चालले. जवळपास ३० हजार भारतीय सैनिक युद्धात सहभागी झाले होते. पाकिस्तानी लष्करातील वेगवेगळ्या रेजिमेंट यामध्ये सहभागी होत्या. त्यांनी तोफखान्याचा वापर केला. रोज बॉम्बगोळे, गोळीबार असा दोन्ही बाजूंनी वर्षाव सुरू होता. भारताने कडवी झुंज देत निकराचा प्रतिकार केला. यामध्ये ५२७ जवान कामी आले, तर १३६३ जवान शहीद झाले. ऑपरेशन विजय ६० दिवसांनंतर यशस्वी झाले. २६ जुलै १९९९ रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला.

कारगिल युद्धात त्यावेळी जिल्ह्यातील काही सैनिक सहभागी होते. युद्धाचा प्रसंग पाहून सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य चिंतेत होते. दुर्दैवी बातमी कानावर पडू नये, अशी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक प्रार्थना करत होते. त्याचवेळी करोली टी (ता. कवठेमहांकाळ) चे वीर पुत्र हवालदार सुरेश गणपती चव्हाण हे महार रेजिमेंटमधून पाकिस्तानी सैन्याला मुकाबला करताना शर्थीची झुंज देत होते. त्यांनी व त्यांच्या रेजिमेंटने अतुलनीय शौर्य गाजवत शेकडो पाकड्यांना यमसदनी पाठवले. सुरेश चव्हाण हे तब्बल दोन महिने शत्रूशी लढत होते. दि. ४ जुलै रोजी ते धारातिर्थी पडले. त्यांच्या शहीद होण्याची वार्ता समजताच करोली टी नव्हे तर जिल्हा शोकसागरात बुडाला.कारगिल युद्ध संपण्याची सर्वांनाच प्रतीक्षा असताना जिल्ह्यात आणखी एक दुर्दैवी बातमी येऊन धडकली. वडगाव (ता. तासगाव) येथील पॅरा रेजिमेंटचे शिपाई महादेव नामदेव पाटील हे कारगिलमध्ये युद्धात पराक्रम गाजवत होते. त्याचवेळी शत्रूच्या हल्ल्यात दि. २४ जुलै १९९९ रोजी वीरगती प्राप्त झाली. त्यामुळे जिल्हा पुन्हा शोकसागरात बुडाला. जिल्ह्यातील या दोन वीर पुत्रांनी युद्धात गाजवलेल्या पराक्रमाला आणि त्यांच्या वीरगतीला दि. २६ जुलै रोजी २५ वर्षे होत आहेत. त्यांच्या पराक्रमाच्या आठवणीही आज स्मरणात आहेत.

शौर्याची परंपरास्वातंत्र्यपूर्व काळात जिल्ह्यातील क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. हीच शौर्याची परंपरा जिल्ह्याने जपली आहे. सैन्यदलात सद्य:स्थितीत २० हजारांहून अधिक जवान कार्यरत आहेत, तर देशसेवा बजावलेले तेवढेच माजी सैनिक जिल्ह्यात आहेत.

आजवर १६० शहीदभारत-पाक, भारत-चीन युद्धासह वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील वीर जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवले आहे. आजवर १६० जवान शहीद झाले. ७० जणांना शौर्यपदक मिळाले.

टॅग्स :SangliसांगलीKargil Vijay Diwasकारगिल विजय दिन