शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

सांगली महापालिकेस 'इतक्या' कोटींचे 'कोरोना साहाय्य अनुदान' प्राप्त, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार ५० लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 13:47 IST

मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळाला मोठा आधार

सांगली : कोरोनाच्या काळात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून काम केले. यात काही कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्य शासनाने मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांचे साहाय्य अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार महापालिकेला सहा कोटींचा निधी प्राप्त होणार आहे. यातून मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाखांची रक्कम दिली जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाकाळात महापालिका सर्व स्तरावर साथ आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेत होती. सफाई कामगारापासून आयुक्तापर्यंत सारेच अधिकारी रस्त्यावर होते. आरोग्य विभागाकडील डाॅक्टर, परिचारिका, आशा वर्कर होम टू होम जाऊन सर्वेक्षण करत होत्या. महापालिकेने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी १०० खाटांचे केअर सेंटरही सुरू केले होते. या केअर सेंटरमध्ये दोन हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. सफाई कामगारांकडून शहराच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न केले जात होते. अशात अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती.

कोरोनामुळे महापालिकेच्या १२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यात प्रभारी स्वच्छता निरीक्षक, दोन वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, बागमजूर, वाहनचालकासह चार सफाई कामगारांचा समावेश होता. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने २०२१ मध्ये मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. महापालिकेकडून मृत कर्मचाऱ्यांची माहितीही मागविली होती. त्यानुसार महापालिकेने आवश्यक ती माहिती शासनाला सादर केली होती. आता शासनाने मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांचे अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेला ६ कोटींचा निधीही वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्या