शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

सांगली जिल्ह्यात ५२ बोगस खते, बियाण्यांबद्दल न्यायालयात दावा; कृषी विभागाची कारवाई 

By अशोक डोंबाळे | Published: September 19, 2023 6:46 PM

चौदाशे नमुन्यांची कृषी विभागाकडून तपासणी

सांगली : जिल्ह्यात १०० टक्के पेरण्या झाल्या नसल्या तरी हंगामासाठी आलेले खते, बियाणे आणि किटकनाशकांमध्ये अप्रमाणितपणा (बोगस) आढळून आले आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी दुकानांमध्ये विक्रीसाठी आलेल्या एक हजार ४०० नमुन्यांची तपासणी केली असून त्यामध्ये खतांचे ३८, बियाणे ९ आणि किटकनाशकांचे ५ नमुने बोगस असल्याचे स्पष्ट झाले. तपासणीमध्ये त्रुटी आढळल्याने ५२ नमुन्यांप्रकरणी न्यायालायत दावा दाखल केल्याचे कृषी विभागाने सांगितले.खरीप हंगामासाठी कृषी विभागाने खते आणि बियाण्यांची मागणी केली आहे. खतांचा पुरवठा आणि विक्री होताना शेतकर्यांना त्रास होणार नाही, याबाबतची दक्षता घेण्यात आली. जिल्ह्यात खताचे होलसेल व किरकोळ असे मिळून पाच हजार १७५ वितरक आहेत. हंगामाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यापासून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले होते. निविष्ठा गुणनियंत्रण कामकाजासाठी जिल्ह्यात गुणनियंत्रण निरीक्षक व अकरा भरारी पथका मार्फत निविष्ठा वितरकांचे तपासणी व बियाणे खते औषधे नमुने काढण्याची कार्यवाही केली. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जे वितरक विहित कालमर्यादेत परवाना नुतनीकरण केलेले नसल्याचे स्पष्ट झाले. परवान्याची मुदत संपल्यानंतरही दुकानातून विक्री करण्यात आली त्यांच्यावर कारवाई केली होती.पेरण्या झाल्या नसल्या तरी कृषी सेवा केंद्रामध्ये विक्रीसाठी आलेल्या खते, बियाण्यांची तपासणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात तीन प्रकारच्या सुमारे चौदाशे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तपासणीसाठी खतांचे तब्बल एक हजार १०० नमुने तपासले असून त्यापैकी ३८ नमुने अप्रमाणित असल्याचे आढळून आले. बियाण्यांचे ३३५ नमुन्यांनंतर ९ बोगस आणि किटकनाशकांचे २१३ नमुन्यांची तपासणी केली, त्यामध्ये पाच नमुने बोगस असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सदोष खते, बियाणे आणि किटकनाशकास विक्री बंदचे आदेश देण्यात असून याप्रकरणी संबंधित कंपन्यांविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.जादा दराने विक्री तरीही कारवाईकडे दुर्लक्षकृष्णा आणि वारणा नदीकाठी पाण्याची सुविधा असल्याने जिल्ह्याच्या पश्चिम भागात पेरण्या पूर्ण झाल्या. परंतु पूर्व भागाला पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे एक लाख हेक्टर क्षेत्र नापेर राहिले. जिल्ह्यात युरिया खताचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही वाळवा, शिराळा, तासगाव तालुक्यातील शेतकर्यांना युरियाची गोणी जादा दराने विकत घ्यावे लागली होती. याकडे कृषी विभागाने दुर्लक्ष का केले, असा सवालही शेतकऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र