शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

सांगलीतील कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ५२० कोटी थकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 12:11 PM

१५ टक्के व्याजासह बिले देण्याची शेतकऱ्यांची मागणी

सांगली : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी शेतकऱ्यांना ऊस बिलाचे पैसे मिळाली नाहीत. जिल्ह्यातील कारखान्याकडे जवळपास ५२० कोटी रुपये थकीत आहेत. ऊस दराची कोंडी फुटत नसल्यामुळे बिल वर्ग न केल्याचे जुजबी कारण साखर कारखानदार देत आहेत. दरम्यान, या कारखान्यांनी १४ दिवसांत बिल न दिल्यामुळे १५ टक्के व्याजासह पैसे तत्काळ वर्ग करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांपैकी १७ कारखान्यांचे गळीत हंगाम चालू आहेत. या कारखान्यांकडून प्रतिदिन एकूण ७५ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ३२ लाख टनांहून अधिक उसाचे गाळप केले आहे. या कारखान्यापैकी क्रांती कारखान्याने प्रति टन ३१०० रुपये आणि दत्त इंडिया कारखान्याने एफआरपी अधिक १०९ रुपये पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. उर्वरितांची इतर देणी प्रलंबित आहेत. त्यांची इतर देणी प्रलंबित आहेत. कारखान्यांकडे जवळपास ५२० कोटी रुपये थकीत राहिले आहेत. या कारखान्यांनी ऊस दराची कोंडी फुटली नसल्यामुळे बिल वर्ग करण्यात अडचणी आल्याचे सांगण्यात आले.

शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारजिल्ह्यातील कारखान्यांनी आतापर्यंत ३२ लाख टन उसाचे गाळप केले आहे. गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला, तरीही ऊस दराची कोंडी फुटली नसल्यामुळे शेतकऱ्यांची बिले कारखान्यांनी थांबविली आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांकडे ५२० कोटी रुपयांची ऊस बिले थकली आहेत. शेतकऱ्यांना १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले जमा करावीत, अशी मागणी शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

शासन आदेशाकडेही दुर्लक्ष'ऊस नियंत्रण आदेश १९६६' नुसार गळीतासाठी ऊस कारखान्यास दिल्यापासून १४ दिवसांत शेतकऱ्यांना एफआरपी दिली पाहिजे. त्यापेक्षा उशीर केल्यास १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना उसाची बिले द्यावीत, असे शासन आदेशात म्हटले आहे. पण, या नियमाचे कारखान्यांनी पालन केले नाही.

ऊस दराची आज बैठकही रद्दऊस दराची कोंडी फोडण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची मंगळवार दि. २६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार होती. या बैठकीत ऊस दराची कोंडी फुटणार होती. पण, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी रजेवर गेल्यामुळे दि. २६ रोजी बैठक होणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी