शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

राज्यातील ६० हजार एकर द्राक्षबागांवर कुऱ्हाड; उत्पादन खर्च चौपट, दरात घसरण

By अशोक डोंबाळे | Updated: December 15, 2024 08:19 IST

शेतकरी कर्जाच्या विळख्यात

अशोक डोंबाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : शासनाची चुकीची धोरणे, व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, नैसर्गिक संकट व दराच्या घसरणीचे ग्रहण, उत्पादन खर्चातील वाढ यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. वर्षभरात राज्यात ६० हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष बागाच शेतकऱ्यांनी काढून टाकल्याचे चित्र आहे. 

निर्यात धोरण, जीएसटीसारख्या कराची आकारणी, मजुरांचा तुटवडा, व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, हमीभाव नसणे, अवकाळी पाऊस, गारपीट, अशा संकटांच्या मालिकांमुळे नाशिकसह सांगली, सोलापूर, बारामती, इंदापूर व पुणे या भागांतील द्राक्षबागा उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली. सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

चार वर्षात हवामान बदलाचा फटका

द्राक्षबागेतून उत्पन्न घेण्यासाठी एक एकर क्षेत्रासाठी सरासरी चार लाख रुपये एवढा खर्च होतो. गेल्या चार वर्षात हवामान बदल द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर आला आहे. उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळच बसत नसल्याने राज्यातील द्राक्ष बागायतदारांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. चार लाखांच्या नुकसानीला शासनाकडून केवळ १४ हजारांची भरपाई दिली जाते, अशी माहिती द्राक्ष बागायतदारांनी दिली.

राज्य शासनाकडून केंद्राकडे पाठपुरावा गरजेचा द्राक्ष शेती वाचविण्यासाठी रासायनिक खत, कीटकनाशकांचे दर निश्चित झाले पाहिजेत. जीएसटी रद्द करून सवलतीत पेट्रोल, डिझेल पुरवठा करून द्राक्ष निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. हे सर्व राज्य सरकारच्या हातात असून, त्यांनी केंद्राकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. - कैलास भोसले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ

वार्षिक उलाढाल (रुपयांमध्ये) २२,५०० कोटी एकरी खर्च सरासरी सरकारी नुकसान भरपाई १४,०००

 

टॅग्स :Grapeद्राक्षेAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी