शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

सांगली जिल्ह्यातून घरपट्टी, पाणीपट्टीचे ७९ कोटी वसूल, विशेष मोहिमेमुळे वसुलीस गती 

By अशोक डोंबाळे | Published: April 25, 2023 6:44 PM

ग्रामपंचायत निवडणुकीचाही झाला फायदा

सांगली : जिल्ह्यातील ६९८ ग्रामपंचायतींकडून घरपट्टीचे ४७ कोटी २१ लाख आणि पाणीपट्टीचे ३२ कोटी २ लाख ५४ हजार रुपयांची वसुली झाली आहे. लोकअदालत, ग्रामपंचायतींनी विशेष मोहीम राबविल्यामुळे आणि ग्रामपंचायत निवडणुकीमुळे घरपट्टी, पाणीपट्टी वसुली चांगली झाली आहे.जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात ५५ कोटी ८० लाख ४४ हजार रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट होते. यापैकी पूर्वीची थकबाकी ७ कोटी ७५ लाख ५३ हजार आणि चालूचे ४७ कोटी ४६ लाख ३८ हजार रुपयांचा समावेश आहे. यापैकी ४७ कोटी २१ लाख रुपये वसूल झाले असून ते प्रमाण ८४.६० टक्के आहे. तसेच पाणीपट्टीचे ३७ कोटी ६२ लाख २० हजार रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते. यामध्ये पूर्वीची थकबाकी ५ कोटी ६ लाख ८९ हजार, ३२ कोटी ५५ हजार ३१ हजारांचा समावेश आहे. यापैकी ३२ कोटी २ लाख ५४ हजार रुपये वसूल झाले असून ८५.१२ टक्के वसुलीचे प्रमाण आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत गावपातळीवर आपापल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांकडून घरपट्टी, पाणीपट्टी व दिवाबत्ती कराची वसुली करण्यात येते. त्यानुसार दरवर्षी मार्चपर्यंत जास्त कर वसूल करण्यासाठी प्रयत्न होतात. यासाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात अधिकाधिक वसुली करण्यावर भर दिला जातो. यंदा मात्र याच महिन्याच्या १४ तारखेपासून सर्वच सरकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर गेले होते. हा संप आठवडाभर चालल्यामुळे आणि काही सरकारी सुट्यांमुळे मार्च महिन्यातील केवळ दहा दिवस हे कर वसुलीसाठी मिळाले. याचा परिणाम हा करवसुलीवर झाला आहे. परिणामी कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आल्याचे दिसत आहे.लोकअदालतींचा करवसुलीसाठी मदत : तानाजी लोखंडेगेल्या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कराची ५५ कोटी ८० लाख ४४ हजार रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ठेवले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वर्षभरात तीन ते चार लोकअदालतींचे आयोजन केले होते. या लोकअदालतींचा फायदा हा ग्रामपंचायत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी झाल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांनी सांगितले.अशी झाली वसुली (रक्कम लाखात)तालुका - घरपट्टी - पाणीपट्टीवाळवा - ९०२.९१ - ६२५.३६पलूस - ४०७.६३ - ३३९.३९खानापूर - ३०५.४५ - १९८.१४तासगाव - ३६१.८२ - ३०१.०७जत - ४४२.०८ - १८०.५६मिरज - ९२१.५८ - ६४२.६५शिराळा - २८७.६० - २८६.९१कडेगाव - ३८५.२० - २१९.१०आटपाडी - ३६०.१० - २३६.७०क.महांकाळ - ३४५.९१ - १७२.६६एकूण - ४७२.१३ - २०२.५४

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायत