शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तिपीठ रद्द करा, शेतकऱ्यांची सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी 

By अशोक डोंबाळे | Published: March 07, 2024 7:00 PM

महामार्गात येणारी शेती ही पूर्णपणे बागायती

सांगली : शासनाच्या प्रस्तावीत शक्तिपीठ महामार्गामुळे जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त हाेणार असल्यामुळे प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग शासनाने रद्द करावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. तसेच शासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणाही शेतकऱ्यांनी दिल्या. शक्तिपीठ महामार्गासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये जमिनी देणार नाही, असा पवित्राही शेतकऱ्यांनी घेतला.शक्तिपीठ महामार्ग शेत बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संग्राम पाटील, प्रवीण पाटील, उदय पाटील, मणेराजुरीमधील शेतकरी प्रभाकर तोडकर, सुनील पवार, सुभाष चव्हाण, भाऊसो जाधव, प्रकाश साळुंखे, कुमार पवार, अमरदीप यादव आदी उपस्थित होते. या आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, शक्तिपीठ महामार्ग आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज तालुक्यातून जात असून या महामार्गात येणारी शेती ही पूर्णपणे बागायती जमीन आहे. जिल्ह्यातील सिंचन योजना पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःचे भांडवल घालून जमिनी विकसित केल्या आहेत. त्यामुळे या जमिनींचा बाजारभाव हा गगनाला भिडला आहे.

शासनाच्या प्रचलित नियमानुसार शासन रेडिरेकनरचा दर गृहित धरून या जमिनींचे मूल्यांकन करणार आहे. ऑक्टोबर २०१८ च्या परिपत्रकानुसार राज्य अगर राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या जमिनीचे मूल्यांकन एक गुणांकाने करण्याचे शासनाचे धोरण आहे. अशा सर्व कायदेशीर नियमानुसार शेतकऱ्यांना महामार्गासाठी जमिनी द्यायला परवडत नाही. काही अल्पभूधारक शेतकरी शक्तिपीठ महामार्गामुळे भूमिहीन होणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीhighwayमहामार्ग