शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कर्नाटकातील हिप्परगी, अलमट्टीतील बेकायदेशीर पाणीसाठ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; महापूर नियंत्रण समितीचा आरोप 

By अशोक डोंबाळे | Published: July 13, 2024 6:56 PM

सांगली, कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याविरोधात याचिका दाखल करणार

सांगली : कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि कृष्णा नदीवरील हिप्परगी बंधाऱ्यामध्ये नियमबाह्य पाण्याचा साठा केला आहे. त्याकडे सांगली व कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि जलसंपदाचे कार्यकारी अभियंता पूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. या अधिकाऱ्यांची भूमिका कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांना महापूर येण्याच्यादृष्टीने आहे. म्हणून त्यांना नोटिसा दिल्या असून, भविष्यात त्यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील व सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी शनिवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत दिली.सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता म्हणाले, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती आणि आंदोलन अंकुश या संघटनांतर्फे ॲड. ओंकार वांगीकर यांनी ही नोटीस दिली आहे. जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभागाला महापुराच्या संकटाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कायदेशीर नोटीस दिली आहे. दोन्ही जिल्ह्यांतील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना वारंवार पत्रे, सूचना पत्रे, इशारा पत्रे दिली आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कर्नाटकातील जलसंपदा विभागाबरोबर व प्रशासनाबरोबर समन्वय ठेवा, अशी सूचना दिली होती. अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथील पाण्याची पातळी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ठेवली जात आहे की नाही, याकडे बारकाईने लक्ष ठेवा. तसे आढळले नाही तर तातडीने कर्नाटक प्रशासनाशी संपर्क साधून पाण्याची पातळी कमी करायचा आग्रह धरण्याची सूचना मुख्यमंत्री शिदे यांनी दिली होती. परंतु दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा प्रशासन, कार्यकारी अभियंता यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे, असे स्पष्ट दिसत आहे. म्हणूनच कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यात पाणीसाठा नियमबाह्यरीत्या वाढतच आहे. पावसाचे प्रमाण यापुढे वाढत जाणार आहे. साहजिकच कृष्णा खोऱ्यातील कोयना, वारणा, राधानगरीसह सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्गही वाढवावा लागणार आहे. त्यामुळे महापुराचा सांगली व कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना फटका बसणार आहे. म्हणून कोल्हापूर, सांगली जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना नोटिसा बजावल्या आहेत. यातूनही त्यांनी महापूर रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाही तर त्यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही महापूर नियंत्रण समितीचे सर्जेराव पाटील यांनी दिला आहे.

१५ ऑगस्टपर्यंत कसोटीचा काळकृष्णा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आता पावसाचा जोर हळूहळू वाढत आहे. १५ जुलै ते १५ ऑगस्ट हा अत्यंत कसोटीचा काळ आहे. आतापासूनच जिल्हा प्रशासनाने, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत तातडीने हालचाल करणे गरजेचे आहे, अशी मागणी सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसKarnatakकर्नाटकDamधरणfloodपूर