शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

‘वालचंद’ बंद ठेवून प्रशासकांचे स्वागत

By admin | Published: July 10, 2017 11:33 PM

‘वालचंद’ बंद ठेवून प्रशासकांचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या प्रशासक मंडळाचे स्वागत सोमवारी ‘महाविद्यालय बंद’ने करण्यात आले. ‘वालचंद’मधील सर्वच कार्यालये कुलूपबंद असल्याने प्रशासकांना संगणक प्रयोगशाळेत बैठक घ्यावी लागली. महाविद्यालयाचे संचालक जी. व्ही. परिशवाड यांच्यासह २५० प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरविली. दरम्यान, परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. येथील सुप्रसिद्ध वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मालकी हक्कावरून महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी व अजित गुलाबचंद यांच्या व्यवस्थापन समितीमध्ये वाद सुरू आहे. गतवर्षी महाविद्यालयाचा ताबा घेण्यावरून दोन्ही गटात जोरदार वाद झाला होता. अखेर शनिवारी वालचंद महाविद्यालयावर राज्य शासनाकडून प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक प्रमोद नाईक, शासननियुक्त सदस्य मकरंद देशपांडे व आयसीसीआय दिल्लीचे प्रतिनिधी अशी तीन सदस्यांची नेमणूक केली आहे. सोमवारी प्रमोद नाईक यांनी महाविद्यालयात प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची बैठक बोलाविली होती. प्रशासक मंडळाकडून दैनंदिन कामकाजासही सुरुवात करण्यात येणार होती. पण या प्रयत्नांवर पाणी फिरले. प्रशासक नाईक, मकरंद देशपांडे सकाळी साडेनऊ वाजता महाविद्यालयात दाखल झाले. त्यांचे स्वागत महाविद्यालय बंदने करण्यात आले. सोमवारची सुटी शनिवारीच जाहीर करण्यात आली होती. विशेष म्हणजे कोणताही सण, जयंती, समारंभ नसतानाही महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते. संचालक परिशवाड, उपसंचालक पी. जी. कुलकर्णी यांच्या कार्यालयांसह सर्व विभागांना कुलपे लावण्यात आली होती. महाविद्यालयाच्या आवारात शुकशुकाट होता. विद्यार्थी, प्राध्यापकांपेक्षा पोलिसांचीच संख्या अधिक होती. पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. त्यामुळे संपूर्ण परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. महाविद्यालयातील कार्यालये उघडी नसल्याने, बैठक कोठे घ्यायची, असा प्रश्न प्रशासक मंडळासमोर होता. अखेर संगणक विभागाची प्रयोगशाळा उघडण्यात आली. तेथेच प्रशासक नाईक व देशपांडे यांनी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला ३५० प्राध्यापक व कर्मचाऱ्यांपैकी केवळ ९० ते १०० जणच उपस्थित होते. संचालक परिशवाड, पी. जी. कुलकर्णी यांच्यासह अडीचशे जणांनी बैठकीला दांडी मारली होती. बैठकीत मकरंद देशपांडे म्हणाले की, ‘वालचंद’ला नावारूपाला आणण्यासाठी सर्वांचेच योगदान राहिले आहे. व्यवस्थापनाबाबत न्यायालयात वाद सुरू असल्याने शासनाने दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी समिती स्थापन केली आहे. यापुढे प्रशासक मंडळ जो निर्णय घेईल, त्यानुसार सर्वांनी सहकार्य करावे. महाविद्यालयातील वातावरण कुटुंबासारखे ठेवावे. नाईक यांनीही प्रशासक नियुक्तीमागची शासनाची भूमिका स्पष्ट करीत प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. गैरहजर असणाऱ्यांना : नोटिसाप्रशासक मंडळाच्यावतीने बैठकीचे निमंत्रण संचालक, उपसंचालकांसह सर्व प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. तरीही संचालक परिशवाड यांच्यासह अडीचशेजण गैरहजर होते. त्या सर्वांना नोटिसा काढून त्यांचा खुलासा मागविला जाईल. त्यानंतर उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, संचालक चंद्रशेखर ओक यांच्या निदर्शनास आणून, त्यांच्या आदेशाने गैरहजर राहणाऱ्यांवर पुढील कारवाई होईल, असे सहसंचालक नाईक यांनी स्पष्ट केले. देशपांडे यांच्यावर जबाबदारीप्रशासक मंडळात सहसंचालक प्रमोद नाईक, मकरंद देशपांडे व दिल्लीच्या एआयसीटीचे प्रतिनिधी आहेत. या मंडळाला महाविद्यालयाचे दैनंदिन कामकाज पाहावे लागणार आहे. त्यात मकरंद देशपांडे स्थानिक असल्याने तेच दैनंदिन कामकाजात लक्ष घालतील. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भविष्यात गरज भासल्यास कामकाजासंदर्भात विविध समित्याही स्थापन केल्या जातील, असेही नाईक यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची गैरसोयवालचंद महाविद्यालयाला अचानक सुटी दिल्याने विद्यार्थी, पालकांची गैरसोय झाली. सध्या पदविका, पदवीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी, पालक महाविद्यालयात आले, पण सुटी असल्याचे येथे आल्यानंतरच समजले. त्यामुळे त्यांच्यात नाराजी होती. काही विभागाच्या परीक्षाही सोमवारी होत्या. संचालकांनी कोणतेच आदेश न दिल्याने परीक्षार्थींची कोंडी झाली.