शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

सांगलीतील घरात ऐश्वर्य पाहिले, विश्वासघातही सोसला; बालपणीच्या वेदना मनात खोलवर रुजल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 7:59 AM

मास्टर दीनानाथ यांची बलवंत नाटक मंडळी आर्थिक संकटात सापडल्यानंतर या कुटुंबाची फरफट सुरू झाली. त्यातून सावरण्यासाठी दीनानाथांनी बलवंत पिक्चर्स काॅर्पोरेशन या नावाची सिनेमा कंपनी उभारली. 

अविनाश कोळी - सांगली : नाट्यसंवाद, नाट्यगीतांचा बहर, शास्त्रीय संगीताच्या मैफिलींच्या सुवर्णकाळातून बरसलेली सधनता अनुभवत दीदींचे सांगलीत बालपण बहरले. पण या वाटेवर वेदनांच्या काटेरी प्रवासाने घायाळ होण्याचा अनुभवही याच सांगलीत आला. हेच अनुभव त्यांच्या मनात खोलवर कोरले गेले ते कायमचेच.एस.टी. स्टँडजवळ कोटणीस महाराजांच्या मठासमोर मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी प्रशस्त घर घेतले होते.  मंगेशकर कुटुंबीय वरच्या मजल्यावर आणि तळमजल्यावर त्यांचे गणूमामा म्हणजे मास्टर अविनाश ऊर्फ गणपतराव मोहिते राहायचे. इथे प्रतिष्ठित, विद्वान व गुणवंत मंडळींची कलाकारांची ऊठबस असे. याच घरात लतादीदींसह आशा, उषा, मीना, हृदयनाथ या भावंडांचे बालपण गेले. दीदींचा जन्म इंदूर येथे झाला असला तरी नंतर मंगेशकर कुटुंबीय सांगलीत आले व स्थिरावले. याच ठिकाणी लता मंगेशकरांवर संगीत व नाट्यसंस्कार झाले. याच ठिकाणी घरात त्यांनी अनेक नाटकांचे खेळ म्हणून सराव केले आणि परिणामी त्यांना नाटकात अभिनयाची संधीही मिळाली.

वैभवसंपन्न कुटुंबाची फरफट - मास्टर दीनानाथांची मुले म्हणून सांगलीत भावंडांना मानसन्मान मिळाला. १९३५ ते १९४० हा त्यांचा सांगलीतील काळ संमिश्र अनुभवांचा राहिला. ज्या सांगलीत त्यांनी आनंद, समृद्धी, मैत्री, नात्यांचा गोडवा, व्यावसायिक यश अनुभवले, त्याच सांगलीत त्यांना यातनादायी अनुभवही आले. मास्टर दीनानाथ यांची बलवंत नाटक मंडळी आर्थिक संकटात सापडल्यानंतर या कुटुंबाची फरफट सुरू झाली. त्यातून सावरण्यासाठी दीनानाथांनी बलवंत पिक्चर्स काॅर्पोरेशन या नावाची सिनेमा कंपनी उभारली. 

या कंपनीलाही अपयश आले आणि आर्थिक डोलारा कोसळला. राहत्या घरासह गाव सोडून पुण्याला स्थलांतरित होण्याची वेळ मंगेशकर कुटुंबीयांवर आली. सांगलीतील शेवटचे हलाखीचे दिवस लता मंगेशकर यांना सर्वांत वेदना देणारे होते. शेवटपर्यंत त्यांना या घटना सतावत राहिल्या. प्रचंड उलथापालथ अनुभवत, अगदी लहान वयातच लता मंगेशकरांना सांगलीचा निरोप घ्यावा लागला होता.

जवळच्यांकडून घात -नातलग, स्नेही अशा सर्वांनी मास्टर दीनानाथ यांचा विश्वासघात केला. पडत्या काळात त्यांची साथ सोडली. ‘कृष्णार्जुनयुद्ध’ या सिनेमाच्या व्यवहारामध्ये एक खोटी केस दीनानाथ यांच्यावर झाली. एका मित्राने मदतीच्या बहाण्याने घरातील सर्व दागिने काढून घेतले. नंतरच्या सुवर्णकाळातही लता मंगेशकर कधीही या घटना विसरू शकल्या नाहीत.

पन्हाळ्यावरील बंगलास्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानातून सुटल्यानंतर त्यांना निवांत राहण्यासाठी भालजी पेंढारकर यांनी मूळ बंगला पन्हाळ्यावर बांधला. त्यावेळी त्यांनी तो पूर्ण चुन्यात बांधून घेतला होता. नंतर जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला आणि त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी स्टुडिओ, पन्हाळ्याचा बंगला लताबाईंना विकला. नंतर लताबाईंनी बंगला पूर्ण पाडण्याच्या सूचना केल्या व तिथे पुन्हा नवीन बंगला बांधला. 

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरSangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रcinemaसिनेमा