शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सांगलीतील साखराळेचा सुपुत्र बनला नीती आयोगाचा कृषी सल्लागार, पंतप्रधान मोदींसमवेत काम करण्याचा मिळाला बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 11:46 IST

नीती आयोग ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था

युनूस शेखइस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथील कृषी धोरण शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. शशांक कुलकर्णी यांची भारत सरकारच्या कृषी व संलग्न विषयाचे सल्लागार म्हणून निवड झाली आहे. नीती आयोग ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत.डॉ. कुलकर्णी हे कृषी धोरण अभ्यासक आहेत. सध्या ते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार म्हणून काम पाहतात. नवी दिल्ली येथील भारतीय ॲग्रो इकॉनॉमिक रिसर्च सेंटरच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे वरिष्ठ संशोधक सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.भारताच्या शेतकरी धोरणाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या मूलभूत संशोधन कार्याची दखल घेऊन दक्षिण अमेरिकेतील रिपब्लिक ऑफ पनामा या देशातील प्रख्यात स्वाहिली विद्यापीठाने त्यांचा डी.लिट. पदवी देऊन गौरव केला आहे. त्यांनी लिहिलेल्या स्वामीनाथन कमिशन : ए फाउंडेशन ऑफ फार्म्स पॉलिसिज इन इंडिया या त्यांच्या पुस्तकाला भारतीय हरित क्रांतीचे जनक प्रो. एम.एस. स्वामीनाथन यांची प्रस्तावना लाभली आहे.स्वामीनाथन आयोगावर लिहिलेले जगातील पहिले व एकमेव पुस्तक म्हणून नॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. महाराष्ट्र शासनाने डॉ. कुलकर्णी यांच्या समन्वयातून समग्रतेकडे या पुस्तिकेची निवड शासकीय निवडक ग्रंथ सूचित केली आहे. त्यांच्या संशोधन आणि लेखन कार्यासाठी १९ आंतरराष्ट्रीय व १२ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.सर्वोच्च धोरण संस्थेचा भाग बनल्याने कौतूककाही काळ त्यांनी जम्मू-काश्मीर विद्यापीठात वरिष्ठ संशोधक म्हणूनही काम केले आहे. शेती व शेतकरी धोरणांच्या संशोधन क्षेत्रात कुलकर्णी यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधन कार्यामुळे फॉक्सक्लूज या संस्थेने बनवलेल्या भारतातील सर्वोच्च १०० प्राध्यापक, संशोधक व शिक्षकांच्या यादीत त्यांना स्थान मिळाले आहे. देशातील सर्वोच्च धोरण संस्थेत झालेल्या या नियुक्तीमुळे डॉ. शशांक कुलकर्णी यांचे अभिनंदन होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीNIti Ayogनिती आयोगAgriculture Sectorशेती क्षेत्र