शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

सांगली: कृषी विभागाने सुरु केले रब्बी हंगामाचे नियोजन, 'इतक्या' टन खतांची केली मागणी

By अशोक डोंबाळे | Published: October 08, 2022 5:58 PM

खरीप हंगामामध्ये १५ टक्के क्षेत्रावर पेरणी न झाल्यामुळे २७ हजार हेक्टरने रब्बीची पेरणी क्षेत्र वाढणार आहे.

सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते, बियाणांच्या पुरेशा उपलब्धतेसाठी कृषी विभागाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. जिल्ह्यासाठी विविध प्रकारचे २८ हजार ४८५ क्विंटल बियाणे, एक लाख ८० हजार ६१५ टन खतांची मागणी केलेली आहे. खरीप हंगामामध्ये १५ टक्के क्षेत्रावर पेरणी न झाल्यामुळे २७ हजार हेक्टरने रब्बीची पेरणी क्षेत्र वाढणार आहे.जिल्ह्यात १५१ गावे पूर्ण रब्बीची गणली जात असली तरी खरीप आणि रब्बी पेरणीच्या गावांची संख्या २५१ पर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षी रब्बीची पेरणी दोन लाख १७ हजार ७४७ हेक्टरवर पेरणी झाली होती. या वर्षी दोन लाख ४४ हजार ८०० हेक्टरपर्यंत होण्याची शक्यता आहे. बियाणांची कमतरता, गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्ह्यात ११ पथकांची नियुक्ती केली आहे. हंगामात शाळू ज्वारी, हरभरा, मक्याचे क्षेत्र सर्वाधिक असते. परतीच्या पावसावर रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र जत, आटपाडी तालुक्यात असून, शाळू ज्वारीची पेरणी केली जाते. त्यानंतर कवठेमहांकाळ, तासगाव व मिरज पूर्व भागात रब्बी हंगामाचे क्षेत्र आहे.

रब्बीतील प्रमुख पिकेरब्बी हंगामात शाळू ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, सूर्यफूल, भुईमूग, तीळ ही प्रामुख्याने पिके घेतली जातात. शाळूचे पीक सर्वाधिक घेतले जाते. शेतकरी प्रत्येक वर्षी बीजप्रक्रिया केलेले बियाणेच वापरतात. यामुळे चांगले उत्पादन मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. काही मोजकेच शेतकरी घरातील बियाणांवर प्रक्रिया करून वापरत असल्याचे चित्र आहे.

अशी आहे बियाणांची मागणीपिक - बियाणे क्विंटलमध्येज्वारी - ४९३७गहू  -  १००४५मका - ३१५०हरभरा - १०१३६करडई - १२६सूर्यफूल - ७५कांदा - १६एकूण २८४८५

रासायनिक खतांची मागणीखत प्रकार - मागणी टनातयुरिया  -  ५४४६०डीएपी  - २१८३७एमओपी  - २२१३४कॉप्लेक्स - ४१४५४एसएसपी - ३१६५४इतर खते - ९०७२एकूण - १८०६१५

रब्बी हंगामासाठी लागणारे बियाणे आणि रासायनिक खतांचा मुबलक साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. कोणत्याही रासायनिक खताची टंचाई निर्माण होणार नाही, असे नियोजन पूर्ण केले आहे. कुठेही शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी ११ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. -विनायक पवार, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी