शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

ऐन दुष्काळात ‘पोखर्णी’करांना स्वखर्चाने पाण्याचे वाटप

By admin | Published: April 07, 2016 11:06 PM

पाटील-पाटोळे यांचा उपक्रम : गावकऱ्यांची तहान भागविली

आष्टा : राज्यात सर्वत्र दुष्काळ आहे. सांगली जिल्ह्यातील काही भागाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पोखर्णी येथील महिला व ग्रामस्थांना गावविहिरीला पाणी कमी झाल्याने दुष्काळाचे चटके बसत असताना नागाव-पोखर्णीसह पाणी पुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार पाटील व संचालक दत्तात्रय दादू पाटोळे यांनी स्वखर्चाने गावकऱ्यांना पाणी देत आदर्श घालून दिला आहे.वाळवा तालुक्यातील पोखर्णी छोटेसे खेडेगाव. या गावाला मागील अनेक वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करावी लागत होती. गावातील शेतीला पाण्यासाठी दोन सहकारी व दोन खासगी पाणी संस्था आहेत. मात्र गावात पाणी नसल्याने गावाजवळूनच जाणाऱ्या नागाव-पोखर्णी पाणी पुरवठा संस्थेच्या पोखर्णी येथील सभासदांची बैठक झाली. या बैठकीत सामाजिक बांधिलकीतून गावाला पाणी देण्याचे ठरवण्यात आले. गाव विहिरीत पाणी सोडण्याऐवजी गावात विविध ठिकाणी पाईपलाईनद्वरे नळ काढून पाणी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मुख्य पाईपलाईनपासून सुमारे २ हजार फूट पाईपलाईन करण्याचे ठरले. संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार पाटील, दत्तात्रय पाटोळे यांनी स्वखर्चातून पाईपलाईन पूर्ण केली. अध्यक्ष धोंडीराम जासूद, कुमार पाटील, रघुनाथ जासुद, रघुनाथ मंडले, भानुदास पाटील, संभाजी पाटील, बाळासाहेब बादटे, नागनाथ जाधव, रमेश आवळे, अरविंद पाटील, पोपट पाटोळे, रघुनाथ सुतार, रघुनाथ जाधव, शामराव जाधव उपस्थित होते. पाणी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या उपक्रमाचे आ. जयंत पाटील यांनी कौतुक केले आहे. (वार्ताहर)