शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी लवादाची नियुक्ती तातडीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 1:25 PM

highway Sangli- रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील भूसंपादनासाठी लवादाची नियुक्ती तातडीने करण्याची मागणी शेतकर्यांनी केली. तसे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले.

ठळक मुद्देरत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी लवादाची नियुक्ती तातडीने करा जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन

सांगली : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील भूसंपादनासाठी लवादाची नियुक्ती तातडीने करण्याची मागणी शेतकर्यांनी केली. तसे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले.रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांतून जातो. त्यासाठी अनेक एकर शेतजमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्याचे मुल्यांकन चुकीचे झाल्याची तक्रार शेतकर्यांनी केली आहे. दोन्ही तालुक्यांतील काही शेतकर्यांनी जमिनींचा मोबदला अद्याप स्वीकारलेला नाही. काहींनी सशर्त स्वीकारला आहे, तर काहींनी न्यायालयात धाव घेतली आहे.ही कोंडी फुटण्यासाठी लवाद नियुक्ती होण्याची आवश्यकता आहे. सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकार्यांची लवाद म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे गेला आहे, पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. यासंदर्भात महेश सलगरे, रवींद्र पाटील, महादेव कौलापुरे, प्रमोद कबाडे, सचिन पाटील, अरविंद गुळवणे यांच्यासह शंभरावर शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, शेतीचे मुल्यांकन करताना अधिकार्यांनी शेतकर्यांना विश्वासात घेतले नाही.

मोबदल्याचा निवाडा एकतर्फी केला. जमिनींचे बाजारमुल्य मनमानीपणाने निश्चित केले. भूसंपादन कायद्यातील तरतुदींचा विचार न करता मोघम किंमती निश्चित केल्या. त्यामुळे शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. याविषयी दाद मागण्यासाठी लवादाची नियुक्ती तातडीने होणे गरजेचे आहे. भूसंपादन होऊन दोन-तीन वर्षे झाली तरी तो अद्याप नेमला गेला नाही. शेतकर्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांनी स्वीकारले. 

टॅग्स :highwayमहामार्गSangliसांगली