शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

ग्रामपंचायतींच्या पैशांतून मानधनावर शिक्षक नियुक्ती, गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेचा भरारी प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 3:32 PM

त्यासाठीचा वेतनखर्च १५ व्या वित्त आयोगातून केला जाणार

सांगली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये आता ग्रामपंचायतीच्या पैशांतून शिक्षक नेमण्यात येणार आहेत. त्यासाठीचा वेतनखर्च १५ व्या वित्त आयोगातून केला जाणार आहे. वित्त आयोगाच्या आराखड्यामध्ये शैक्षणिक विकासाचाही अंतर्भाव असून, त्यामुळे ग्रामपंचायतींनीही त्याला विरोध केलेला नाही.वित्त आयोगातून शाळांची वीजबिले, पथदिव्यांची बिले यासह अनेक प्रकारचे खर्च केले जात आहेत. यामुळे प्रत्यक्ष विकासकामांसाठी निधीचा तुटवडा निर्माण होत आहे. वित्त आयोगाचा मूळ उद्देशच बाजूला पडत आहे. यातच आता जिल्हा परिषदेनेशिक्षक नियुक्तीचे आदेश काढले आहेत. मानधन तत्त्वावर ते काम करतील.

ग्रामपंचायतींनी आराखड्यात केले बदल

शाळांमध्ये गुणवत्तावाढीसाठी पुण्यातील क्षितिज संस्थेमार्फत भरारी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नोव्हेंबर ते एप्रिल २०२३ असा त्याचा कार्य कालावधी आहे. प्रकल्पाचा सहा महिन्यांचा एकूण खर्च ८२ लाख ४८ हजार २०० रुपये आहे. हा खर्च १५ व्या वित्त आयोगातून करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत. त्यानुसार वित्त आयोगाच्या खर्चाच्या आराखड्यामध्ये ग्रामपंचायतींनी बदलही केले आहेत.

पटसंख्या वाढणारप्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व कौशल्य विकासासाठी हा प्रकल्प राबविला जात असल्याचे जिल्हा परिषदेने म्हटले आहे. त्यातून पटसंख्याही वाढेल आणि विद्यार्थी शिक्षणात रस घेऊ लागतील, असाही दावा करण्यात आला आहे. याची जबाबदारी क्षितिज संस्थेवर सोपविण्यात आली आहे.

असे होणार नियोजन

शाळेत कला, संगीत, नृत्य, खेळ, जीवनकौशल्य, संगणक प्रशिक्षण असे उपक्रम राबविणे, विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन कौशल्य वाढविणे, शिक्षकांना ऑनलाइन अहवाल भरण्यासाठी मदत करणे, अशी कामे क्षितिज संस्थेचे प्रतिनिधी करतील. त्यासाठी वेळापत्रकही निश्चित करून देण्यात आले आहे. एक प्रतिनिधी दोन किंवा तीन शाळांत काम करणार असून, महिन्याभरात दोनच सत्रे घेणार आहे. १३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नियुक्त केला जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी जाहिरात देऊन नियुक्ती करायची आहे.

जिल्हा परिषदेचे शिक्षक सक्षमजिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक उपक्रमशील आणि सक्षम आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळा शिष्यवृत्ती, नृत्य, नाट्य, क्रीडा, विज्ञान प्रकल्प आदी क्षेत्रात राज्य पातळीवर पताका गाजवत आहेत. तरुण पिढीतील शिक्षक उपक्रमशील आहेत. या स्थितीत नव्याने मानधनावर शिक्षक घेऊन खर्चात वाढ कशासाठी, असा प्रश्न ग्रामपंचायती उपस्थित करत आहेत. यातून शिक्षकांवर अविश्वास दाखविला जात असल्याच्याही प्रतिक्रिया आहेत

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायतTeacherशिक्षक