शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचा शेततळ्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:49 IST

शेततळ्यात पोहताना बुडणाऱ्या १३ वर्षाच्या स्वत:च्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात अर्चना अर्जुन हिंगे (वय ४५, रा. बलवडी-खा.) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना

ठळक मुद्देबलवडी (खा.) येथील घटना : प्रसंगावधानामुळे मुलगा बचावलापाण्यात बुडत असलेल्या हर्षद यास वाचविण्यासाठी शेततळ्यात उडी मारली. परंतु, त्यांनाही पोहता येत नसल्याने त्या पाण्यात बुडू लागल्या.

विटा/खानापूर : शेततळ्यात पोहताना बुडणाऱ्या १३ वर्षाच्या स्वत:च्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात अर्चना अर्जुन हिंगे (वय ४५, रा. बलवडी-खा.) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील बलवडी (खा.) येथे सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. यावेळी शेततळ्याच्या पाण्यात बुडत असलेला हर्षद अर्जुन हिंगे (१३) हा स्थानिक लोकांच्या प्रसंगावधानाने बचावला.

बलवडी (खा.) येथील अर्चना हिंगे गावाजवळच्या चव्हाण मळा (शंभूखडी) येथे शेतात राहत होत्या. त्यांच्या घराजवळच मोठे शेततळे आहे. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हर्षद हा त्यांचा १३ वर्षाचा मुलगा पोहण्यासाठी शेततळ्यात उतरला. परंतु, पाणी जास्त असल्याने तो पाण्यात बुडू लागला. हा प्रकार त्याची आई अर्चना यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पाण्यात बुडत असलेल्या हर्षद यास वाचविण्यासाठी शेततळ्यात उडी मारली.

परंतु, त्यांनाही पोहता येत नसल्याने त्या पाण्यात बुडू लागल्या. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावले. अर्चना व हर्षद दोघांनाही पाण्याबाहेर काढण्यात आले. दोघांनाही खानापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच अर्चना यांचा मृत्यू झाला होता, तर हर्षद बचावला.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद विटा पोलिसांत असून उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे तपास करीत आहेत.मुलीची आरडाओरडत्यावेळी शेततळ्याजवळ असलेल्या अर्चना यांच्या मुलीने आरडाओरडा केल्यानंतर शेतात असलेल्या स्थानिक लोकांनी शेततळ्याकडे धाव घेतली. लोकांनी प्रसंगावधान राखून शेततळ्याच्या पाण्यातून अर्चना व हर्षद यांना बाहेर काढले. अर्चना यांच्या नाका-तोंडात पाणी गेले होते.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू