शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

 विशेष व्याघ्र संवर्धन दलास केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा; मेळघाटला मंजुरी, चांदोलीबाबत दुजाभाव का?

By संतोष भिसे | Published: November 19, 2023 5:30 PM

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी येथे चितळ सोडून त्याचे प्रजनन करून संख्या वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. याला यशही येत आहे. मात्र, या वाघांच्या संरक्षणासाठी आवश्यक असणारे विशेष व्याघ्र संवर्धन दल येथे कार्यरत नाही. नऊ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकल्प क्षेत्राची गरज लक्षात घेऊन सह्याद्री व मेळघाट येथे एकाचवेळी हा फोर्स मंजूर केला. मेळघाट येथे हा फोर्स कार्यरत आहे मात्र चांदोली प्रकल्पात अद्याप नाही. या पथकास केंद्राकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. भविष्यात होणाऱ्या व्याघ्र पुनर्वसनाच्या दृष्टीने हे दल कार्यरत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

चांदोली व कोयना अभयारण्यातील ६९०.६३ चौरस किलोमीटर क्षेत्रात शासनाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प घोषित केला आहे. केंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या पुनर्वसनाला तत्त्वतः मंजुरी दिल्यामुळे ताडोबा प्रकल्पातील आठ वाघ सह्याद्रीत आणले जाणार आहेत. यातील चार वाघ चांदोली, तर चार कोयना प्रकल्प क्षेत्रात सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सह्याद्रीत वाघांची डरकाळी घुमणार आहे.२०१० मध्ये प्रथमच वन्यजीव विभागाने ट्रांझेट लाइन पद्धतीने केलेल्या व्याघ्र गणनेत प्रकल्प म्हणून घोषित केलेल्या क्षेत्रात सात, तर प्रकल्पाबाहेरील क्षेत्रात चार असे एकूण अकरा वाघांचे अस्तित्व असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २०१८ मध्ये एका वाघाची छबी कॅमेऱ्यात टिपण्यात आली होती. केंद्राच्या व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या पुनर्वसनाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे ताडोबातील वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

मात्र, या वाघांच्या सुरक्षेसाठी असणारा स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स येथे आवश्यक आहे. तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण यांनी प्रकल्प क्षेत्रातील वाघांची संख्या लक्षात घेऊन सह्याद्री व मेळघाट येथे एकाचवेळी हा फोर्स मंजूर केला. या फोर्समध्ये १२० प्रशिक्षित वन कर्मचारी तसेच अधिकारी असतात. फोर्समुळे वन्यजीव विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या वाढून प्रकल्प क्षेत्रातील वाघांसह इतर प्राण्यांचे संरक्षण होण्यास मदत होते. सध्या हा फोर्स मेळघाटला कार्यरत आहे, मात्र सह्याद्री अर्थात चांदोलीत अद्याप कार्यरत नाही. मंजुरी मिळूनही हा फोर्स कार्यरत नसल्यामुळे वन्यजीव कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांवर याचा ताण पडत आहे.

चितळ हे वाघाचे मुख्य खाद्य आहे. चांदोली जंगलात वाघ आणायचा तर त्याला चितळांची संख्या पुरेशी असणे गरजेचे आहे. म्हणून शासनाने सागरेश्वर, कात्रज , आणि सोलापूर येथून चितळ आणून चांदोली जंगलात सोडण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी आठ हेक्टर क्षेत्राला कुंपण करून चितळांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. याला यशही येत आहे.

टॅग्स :SangliसांगलीTigerवाघ