शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

राज्य कोणाच्या हाती द्यायचे ठरवा, शरद पवार यांनी केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 13:49 IST

'पंतप्रधान, गृहमंत्र्यांची फोडा व झोडाची भाषा'

सांगली : लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन दोन पक्ष फोडून टाकण्यास सांगत आहेत. फोडा व झोडाची भाषा करत आहेत. महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. अशावेळी सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवा. महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा यासाठी जागरूक राहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.मिरजेतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या डी. व बी. फॉर्मसी कॉलेज इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, युवा नेते रोहित पाटील, अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे उपस्थित होते.

पवार म्हणाले, देशात नुकतीच लोकसभा निवडणूक झाली. यावेळी भाजपने चारशे पारची घोषणा केली. परंतु चारशे पार म्हणजे देशाचे संविधान बदलण्यासाठीच्या हालचाली आहेत. चारशे पार गेल्यास संविधानावर संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भूमिका काँग्रेस आणि इतरांनी मांडली. सामान्य मतदार व नागरिकांनी याची नोंद घेत योग्य बाजूने मतदानाचा हक्क बजावला. देशावर संविधान बदलण्याची स्थिती येऊ दिली नाही. संविधानाला धक्का देण्याची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी जागृती केल्यामुळे महत्त्वाच्या संकटातून आपण बाहेर पडलो.ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राची निवडणूक १० तारखेला घोषित होण्याची शक्यता आहे. १५ ते १८ ऑक्टोबरला मतदान घेतले जाईल. आता महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा यासाठी जागरूक राहण्याची गरज आहे. महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे राज्य आहे. केंद्रातील नेत्यांना ते कळल्यामुळे गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात कायम येतात. महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे त्यांनी भाजप नेत्यांना सांगितले आहे.पंतप्रधान, गृहमंत्र्यांची फोडा व झोडाची भाषापंतप्रधान व गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन शरद पवार व ठाकरे यांचे पक्ष फोडून टाका सांगतात. फोडा व झोडा अशी भाषा करत आहेत. परंतु हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. महाराजांनी सन्मान, स्वाभिमान शिकवला. संकटावर मात करण्याची दृष्टी, हिंमत दिली. त्यामुळे महाराष्ट्राचे चित्र अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन शरद पवार यांनी केले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह