शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

राज्य कोणाच्या हाती द्यायचे ठरवा, शरद पवार यांनी केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 1:48 PM

'पंतप्रधान, गृहमंत्र्यांची फोडा व झोडाची भाषा'

सांगली : लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन दोन पक्ष फोडून टाकण्यास सांगत आहेत. फोडा व झोडाची भाषा करत आहेत. महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. अशावेळी सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवा. महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा यासाठी जागरूक राहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.मिरजेतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या डी. व बी. फॉर्मसी कॉलेज इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, युवा नेते रोहित पाटील, अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे उपस्थित होते.

पवार म्हणाले, देशात नुकतीच लोकसभा निवडणूक झाली. यावेळी भाजपने चारशे पारची घोषणा केली. परंतु चारशे पार म्हणजे देशाचे संविधान बदलण्यासाठीच्या हालचाली आहेत. चारशे पार गेल्यास संविधानावर संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भूमिका काँग्रेस आणि इतरांनी मांडली. सामान्य मतदार व नागरिकांनी याची नोंद घेत योग्य बाजूने मतदानाचा हक्क बजावला. देशावर संविधान बदलण्याची स्थिती येऊ दिली नाही. संविधानाला धक्का देण्याची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी जागृती केल्यामुळे महत्त्वाच्या संकटातून आपण बाहेर पडलो.ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राची निवडणूक १० तारखेला घोषित होण्याची शक्यता आहे. १५ ते १८ ऑक्टोबरला मतदान घेतले जाईल. आता महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा यासाठी जागरूक राहण्याची गरज आहे. महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे राज्य आहे. केंद्रातील नेत्यांना ते कळल्यामुळे गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात कायम येतात. महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे त्यांनी भाजप नेत्यांना सांगितले आहे.पंतप्रधान, गृहमंत्र्यांची फोडा व झोडाची भाषापंतप्रधान व गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन शरद पवार व ठाकरे यांचे पक्ष फोडून टाका सांगतात. फोडा व झोडा अशी भाषा करत आहेत. परंतु हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. महाराजांनी सन्मान, स्वाभिमान शिकवला. संकटावर मात करण्याची दृष्टी, हिंमत दिली. त्यामुळे महाराष्ट्राचे चित्र अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन शरद पवार यांनी केले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह