शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

मुलांच्या अभिव्यक्तीला प्रसारमाध्यमात मोठी संधी

By admin | Published: January 22, 2016 12:57 AM

गोविंद गोडबोले : धनगावात बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात; काव्यसंमेलन, एकपात्रीचे आयोजन

भिलवडी : आजचे युग हे प्रसारमाध्यमांचे युग आहे. येत्या काही वर्षांत प्रसारमाध्यमांत मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार असून, मुलांना अभिव्यक्त होता आले पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष व बालसाहित्यिक गोविंद गोडबोले यांनी केले. धनगाव (ता. पलूस) येथे साने गुरूजी संस्कार केंद्र, भिलवडी व जि. प. प्राथमिक शाळा यांच्यावतीने आयोजित पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनामध्ये ते बोलत होते. गोडबोले म्हणाले, कोणतीही कला वाईट असत नाही. बालवयातूनच मुलांनी एखादी कला किंवा छंद जोपासावा. मुलांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनीही प्रयत्नशील राहावे. स्वागताध्यक्ष सुभाष कवडे यांनी, बुध्दी आणि मनाच्या प्रसन्नतेसाठी साहित्याला पर्याय नसून, मातृभाषा हे संस्काराचे माध्यम असल्याचे प्रतिपादन केले. संमेलनाच्या उद्घाटक सुनीता चितळे यांनी, आई-वडिलांना मुलांसाठी वेळ नसल्याने संस्कार केंद्रांची गरच असल्याचे मत व्यक्त केले. तिसऱ्या सत्रात ‘आनंददायी शिक्षणासाठी साहित्य’ या विषयावर बालसाहित्यिका व कवयित्री सौ. वर्षा चौगुले यांची प्रतीक्षा पवार, आदिती माने, आकांक्षा जाधव, श्रुतिका यादव यांच्यासह उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रकट मुलाखत घेतली. बालसाहित्यिका सौ. मीनाक्षी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व कवी संदीप नाझरे यांच्या उपस्थितीत ‘किलबिल गाणी’ हे काव्यसंमेलन पार पडले. संदीप नाझरे यांनी ‘रुसलेली कळी’ ही कविता सादर केली. सरोज गुरव, उत्कला आढाव या शिक्षकांसह पारस साळुंखे, श्रुती पाटील, सायली अनुगडे, प्रतीक्षा पवार, साक्षी फडतरे, सिध्दी साळुंखे, अंजली माने, विभावरी उतळे, तुषार पाटील यांच्यासह २७ बालकवींनी यात सहभाग घेतला. ‘धमाल गोष्टी’ या सत्रात सौ. भाग्यश्री चौगुले यांनी सादर केलेल्या प्रापंचिक गमती-जमतीवरील एकपात्री प्रयोगाने धमाल उडवून दिली. अध्यक्ष ‘हास्ययात्रा’कार शरद जाधव यांनी हास्याचे उत्तम आरोग्यासाठीचे महत्त्व विषद केले. धनगावच्या सरपंच सौ. सुवर्णा पाटील, उपसरपंच घन:श्याम साळुंखे, दीपक भोसले, दत्ता उतळे, सचिन साळुंखे, संभाजी साळुंखे, संजय रोकडे, बाळासाहेब कांबळे, डॉ. सुमित साळुंखे, अशोक साळुंखे, शरद साळुंखे, संभाजी यादव, सौ. जिजाबाई साळुंखे, अपर्णा हिरूगडे, वंदना जाधव उपस्थित होते. मुख्याध्यापक कोंडीराम यादव, दिलीप गायकवाड, बाळासाहेब माने, उत्कला आढाव, सरोज गुरव, शशिकांत भागवत, ज्ञानेश्वर रोकडे, अविनाश साळुंखे यांनी संयोजन केले. (वार्ताहर)लक्षवेधी ग्रंथदिंडीलेझीम, झांजपथक व भजनी मंडळाच्या सहभागाने गावातून सवाद्य काढण्यात आलेली ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. पारंपरिक वेशभूषेत व कोल्हापुरी फेटे परिधान केलेले विद्यार्थी सर्वांचे आकर्षण ठरत होते.