शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
2
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
3
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
4
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
5
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
6
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
7
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
8
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
9
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
10
सलमानसोबत हिट सिनेमा, मात्र करिअरमध्ये अभिनेत्री ठरली अपयशी, १२ वर्षांपासून आहे कलाविश्वातून गायब
11
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह 'खतम'! मुलीचाही मृत्यू; इस्रायली लष्कराचा मोठा दावा
12
Investment Tips : गुंतवणूकदारांसाठी आली सुरक्षित गुंतवणुकीची संधी, सरकार उभारणार २० हजार कोटी, तुम्हालाही संधी मिळणार
13
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
14
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
15
Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!
16
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
17
फवाद खानच्या पाकिस्तानी सिनेमाला भारतात बंदीच! 'द लीजेंड ऑफ मौला जट' प्रदर्शित होणार नाही, कारण...
18
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
19
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
20
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती

भाजप सरकार हमाल, कष्टकऱ्यांच्या विरोधात

By admin | Published: April 29, 2016 11:14 PM

बाबा आढाव : दुष्काळाचे राजकारण थांबवून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करा

सांगली : भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांनी हमाल, कष्टकऱ्यांच्या विरोधातील धोरणे राबविण्याचा सपाटाच लावला आहे. परंतु, या धोरणात बदल न केल्यास सरकार उलथवून टाकण्याची हिमतसुध्दा कष्टकऱ्यांमध्येचआहे, हेही त्यांनी विसरू नये, अशी टीका महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी शुक्रवारी येथे केली. दुष्काळग्रस्तांच्या पाण्यावरूनचे राजकारण थांबवा आणि येत्या पावसाळ्यातील पाण्याचा थेंब न् थेंब अडविण्याचे नियोजन करा, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला.सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या वार्षिक सभेत डॉ. आढाव बोलत होते. यावेळी हमाल पंचायतचे सचिव बापूसाहेब मगदूम, बाळू बंडगर, गोविंद सावंत, राजाराम बंडगर, मारूती कोळेकर, प्रल्हाद व्हनमाने, बजरंग खुटाळे, विकास मगदूम, नाना म्हारगुडे, शालन सरगर आदी प्रमुख उपस्थित होते. डॉ. आढाव म्हणाले की, भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून भांडवलदारांना पोषक आणि कष्टकरी, हमाल, शेतकऱ्यांच्या विरोधातील धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. पहिला निर्णय त्यांनी हमाल मापाडी कायद्यातून छोटे उद्योग वगळण्याचा घेतला. संघटनेने विरोध केल्यामुळे पुन्हा तो मागे घेतला. शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा पुढे करून बाजार समित्याच बरखास्त करण्याबाबतही हालचाली होत्या. तसे झाले तर हमाल बांधवांना संरक्षण राहणार नाही. प्रत्येक शासकीय यंत्रणेचे खासगीकरण करण्याचाही सपाटा लावला आहे. ही धोरणे खरोखरच कष्टकरी, शेतकरी आणि हमालांच्या विरोधातील आहेत. म्हणून शासनाच्या या धोरणाविरोधात सर्वांनी संघटित लढा दिला पाहिजे. खासदार, आमदारांच्या पेन्शन वाढीचा ठराव लगेच मंजूर होतो. अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोगही लगेच लागू होतो. परंतु, कष्टकरी, वृध्दांसाठी पेन्शन मंजूर होत नाही. यातूनच देशात गरीब आणि श्रीमंत अशी विषमतेची मोठी दरी निर्माण होत आहे. भाजप सरकारने कष्टकऱ्यांच्याविरोधातील धोरणे बदलली नाहीत, तर सरकार उलथवून टाकण्यात येईल. दरम्यान, डॉ. आढाव यांनी घरकाम करणाऱ्या महिलांनाही मार्गदर्शन केले. पेन्शनच्या प्रश्नावर सांगलीच्या खासदारांची गाडी अडवण्याची सूचना दिली. विद्या स्वामी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)बाजार समित्यांनी हमी फंड तयार करावाशेतीमालाला हमी भाव मिळत नसल्याचे कारण पुढे करून बाजार समित्या बरखास्त करण्याचा सरकारचा डाव होता. पण, तो शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी घातक असून व्यापाऱ्यांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांचे हित सरकारला पाहायचे असेल, तर बाजार समितीच्या परिसरात हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा. तो अधिकार बाजार समित्यांना आहेच. शिवाय, यातूनही हमीभावापेक्षा कमी खरेदी होत असेल, तर बाजार समित्यांनी शेतीमाल हमीभावासाठी फंड तयार करावा. यातूनच हमीभाव शेतकऱ्यांना देण्याची तरतूद करावी, असे मत डॉ. आढाव यांनी व्यक्त केले.हमाल भवनच्या खर्चावरून नेत्यांवर टीकास्त्रसांगली जिल्हा हमाल पंचायतीतर्फे हमाल भवन बांधण्याचे काम सुरु आहे. यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी १९९५ मध्ये अडीच लाख रुपये दिले होते. याचे व्याजाने २३ लाख झाले असून या निधीतून हमाल भवन बांधले जात आहे. या निधी खर्चावरून बाळू बंडगर यांनी नेत्यांवर टीका केली. या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर डॉ. आढाव यांनी भाषणात बंडगर यांचा समाचार घेतला. पैसे कोणाचे आणि बोलतेय कोण, अशी खिल्ली उडवीत, तुम्ही पैसे गोळा करा आणि त्यानंतर त्याचा हिशेब मागा, असा सल्लाही त्यांनी दिला.अमेरिकेत मोलकरणीला न्याय मिळतो, भारतात का नाही?