शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

कृष्णा नदीच्या प्रदूषणास जयंत पाटील जबाबदार, भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांची टीका

By अशोक डोंबाळे | Published: March 21, 2023 7:32 PM

सांगली : राजारामबापू साखर कारखान्याचे चार प्रकल्प, हुतात्मा, कृष्णासह ९ कारखान्यांचे मळीमिश्रीत पाणी, आष्टा, इस्लामपूर नगरपालिका आणि २९ गावांच्या ...

सांगली : राजारामबापू साखर कारखान्याचे चार प्रकल्प, हुतात्मा, कृष्णासह ९ कारखान्यांचे मळीमिश्रीत पाणी, आष्टा, इस्लामपूर नगरपालिका आणि २९ गावांच्या सांडपाण्यामुळे कृष्णा नदीचे पाणी दूषित झाल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रदूषणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काहीच बोलत नाहीत; परंतु सांगलीच्या स्वप्नपूर्तीच्या प्रदूषणाचा वाद विधानसभेत मांडून स्व. वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यातील वाद उखरून काढला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.पृथ्वीराज पवार म्हणाले, हरित न्यायाधिकरणाच्या समितीचा अहवाल आम्ही जयंत पाटील यांना मुंबईत पोहोच करतो. त्यांनी हिंमत असेल तर तो जसाच्या तसा विधानसभेत वाचून दाखवावा. कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणात माजी खासदार राजू शेट्टी हरित न्यायाधिकरणात गेले आहेत. स्वतंत्र भारत पक्षाच्या सुनील फराटे यांचीही याचिका दाखल आहे. रस्त्यावर, न्यायालयात लढा देऊन कृष्णा प्रदूषण मुक्तीचा सांगलीकरांचा ताकदीने प्रयत्न सुरू आहे. आम्ही या लढ्यात कुठल्या पक्षाचे, व्यक्तिगत वादाचे नावही घेत नाही. ही कृष्णाकाठच्या माणसांची लढाई आहे. जयंत पाटील यांनी मात्र प्रदूषणाचा मुद्दा राजकीय केला. हरकत नाही; पण तुमचे का झाकून ठेवताय, नदी प्रदूषणाला सर्वाधिक जबाबदार त्यांच्याच संस्था आहेत, असे प्रदूषण विभागाचा अहवाल सांगतोय. त्यांना वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. सुधारणा न करता त्यांनी पुन्हा-पुन्हा नदी प्रदूषित केली आहे. राजारामबापू दूध संघ, राजारामबापू कारखाना, राजारामबापू डिस्टलरी, राजारामबापू कंट्री अँड फॉरेन लिकर या संस्था आणि आष्टा, इस्लामपूर पालिकांचे पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे अहवालात म्हटले आहे.

याशिवाय, हुतात्मा साखर कारखाना, हुतात्मा डिस्टलरी, कृष्णा कारखाना आणि डिस्टलरी यांचेही नाव अहवालात आहे. वसंतदादा आणि स्वप्नपूर्तीच्या बरोबरीने या दोषींवर कारवाईसाठी जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलण्याची गरज आहे.

शनिवारी मानवी साखळीकृष्णा नदीच्या प्रश्नावर जनतेमध्ये जनजागृती करण्यासह प्रदूषण करणाऱ्या साखर कारखान्यांचा निषेध करण्यासाठी शनिवार, दि. २५ मार्च रोजी सांगलीत कृष्णा घाटावर मानवी साखळी करण्यात येणार आहे. यातूनही शासनास जाग आली नाही तर मुंबईत आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही पृथ्वीराज पवार यांनी सांगितले.

जिल्हा बँक पदाधिकारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करापृथ्वीराज पवार म्हणाले, स्वप्नपूर्ती शुगर्सने डिस्टिलरी चालवल्याचे प्रकरण तेवढेच गंभीर आहे. जिल्हा बँकेच्या ताब्यात वसंतदादा कारखान्याची डिस्टिलरी होती आणि स्वप्नपूर्तीने परस्पर ती चालवली आणि बँक अधिकारी, पदाधिकाऱ्यांना त्याचा थांगपत्ता लागत नाही, हे पटणारे नाही. त्यासाठी विविध परवाने, वीज कनेक्शन, पाणी कनेक्शन घेतले गेले. त्याचे पैसे कुठे गेले, हे आज तुम्ही विचारत आहात. जर ही डिस्टिलरी जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे तर त्या पैशांना, त्या माध्यमातून झालेल्या कृष्णा प्रदूषणाला जिल्हा बँकेचे अधिकारी आणि पदाधिकारी तेवढेच जबाबदार आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.

वर्षानुवर्षे मासे मेले, जयंतराव आज बोललेपृथ्वीराज पवार म्हणाले, दि. २१ जुलै २०२२ ला मसुचीवाडी, १३ जुलै २०२२ ला नागठाणे ते भिलवडी, ३ फेब्रुवारी २०२१ ला बहे बेट, १५ जुलै २०१९ ला पलूस व सांगली, ३० मार्च २०१५ ला तुपारी बंधारा, वारणा नदीत १७ जानेवारी २०२१ ला दूधगाव, १४ जुलै २०२१ ला मिरज कृष्णा घाट येथे मासे मेले, मगर मेली. त्यावेळी जयंत पाटील यांनी विधानसभेत चर्चा किंवा लक्षवेधी का मांडली नाही?, त्यांनी कृष्णा नदी प्रदूषणावर व्यापक भूमिका मांडून प्रदूषण मुक्तीसाठी सरकारने योजना हाती घेण्याची मागणी केली असती तर आम्ही त्याचे स्वागत केले असते.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषणJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपा