शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

Sangli: संखला बोर नदीचे पात्र कोरडे; खरीप पेरणी वाया, रब्बी हंगामही धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 5:49 PM

शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकरी वर्गातून मागणी

संख : संख (ता. जत) येथील बोर नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पावसाअभावी खरीप पेरणी नाही. चारा नाही, पाणी नाही, अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.जत पूर्व भागात यंदा एकही मोठा पाऊस झाला नाही. उन्हाळी नाही, वादळी नाही आणि वळीवही नाही. अशा परिस्थितीमुळे चालूवर्षी खरीप हंगामाची पेरणी जेमतेम प्रमाणात झाली. ७० ते ८० टक्के क्षेत्र पेरणीअभावी राहिले आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन पावसाळ्यात शेतीला पाणी देणे कठीण बनले आहे. बोर नदीचे पात्र ठणठणीत कोरडे पडले आहे. यामुळे पिके कशी जगवायची, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कसा सोडवायचा? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. खरीप हंगामा वाया गेला आहे. रब्बी हंगामही धोक्यात आहे. ऊस, बाजरी, मका, तूर ही पिके संपली आहेत. बोर नदीचे पात्र कोरडे पडल्याने आलेली पिकेही वाचवणे अशक्य झाले आहे.जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वैरण नाही आणि ओला चारा नाही. अशा परिस्थितीमुळे जनावरे विकण्याची वेळ आली आहे. शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा. तसेच चारा डेपो किंवा चारा छावणी सुरू करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीdroughtदुष्काळ