शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

दीडशे कोटीच्या कामांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:46 IST

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेच्या जवळपास दीडशे कोटीच्या कामांना ब्रेक लागला आहे. यात नगरोत्थान योजनेतून मंजूर ...

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेच्या जवळपास दीडशे कोटीच्या कामांना ब्रेक लागला आहे. यात नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या शंभर कोटीच्या निधीचाही समावेश आहे. याशिवाय समाजकल्याण, नगरसेवकांच्या स्थानिक विकास निधीतील कामेही आचारसंहितेच्या कात्रीत अडकली.महापालिकेला नगरोत्थान योजनेतून शंभर कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून २७८ कामांची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात रस्ते, गटारी, भाजी मंडई, नाट्यगृहाचे नूतनीकरण यासह अनेक कामांचा समावेश आहे. निवडणूक आचारसंहितेपूर्वी ही कामे सुरू व्हावीत, यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी कमी कालावधी म्हणजे सात दिवस मुदतीची निविदाही काढण्यात आली. या निविदा प्रसिद्ध करून चार दिवस झाले आहेत. पण आचारसंहिता लागू झाल्याने निविदेची पुढील प्रक्रिया थांबणार आहे. आता ही कामे मे महिन्यातच सुरू होतील.जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला दलित वस्ती सुधारसाठी निधी मिळाला होता. गेल्यावर्षी ११.४५ कोटीचा निधी आला होता. पण हा निधी महापालिकेने वेळेवर खर्च न केल्याने पावणेसात कोटीचा निधी परत गेला आहे. आता उर्वरित पाच कोटीची कामे मार्चपर्यंत मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. पण आचारसंहितेमुळे ही कामेही कात्रीत सापडली आहे. नगरसेवकांच्या स्थानिक विकास निधीतून दोन लाखांच्या कामाच्या फायली मोठ्या प्रमाणात तयार आहेत. पण ही कामे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून थांबविली आहेत.महापालिकेच्या अंदाजपत्रकात नगरसेवकांसाठी दहा लाखाचा निधी देण्यात आला होता. या निधीतील कामांचे प्रस्तावही तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. गेल्याच आठवड्यात मंजुरीसाठी अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली. काही कामांना आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविला, तर काही कामांच्या प्रस्तावांवर शेरे मारण्यात आले आहेत. या जवळपास सात ते आठ कोटीच्या कामांना ब्रेक लागला आहे.मे महिन्यात कामांचा धुरळामहापालिकेकडून तब्बल दीडशे कोटीची कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. काही कामांच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत. पण आचारसंहिता लागू झाल्याने ही सर्व कामे थांबणार आहेत. मे महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरू होतील. त्यामुळे पुढील दोन महिने प्रशासकीय स्तरावर सामसूमच राहणार आहे.बजेट अडकलेमहापालिकेचे बजेटही आचारसंहितेत अडकले आहे. प्रशासनाने साडेसातशे कोटीचे बजेट स्थायीकडे सादर केले होते. स्थायीकडून महासभेकडे बजेट गेलेले नाही. आता निवडणुकीनंतरच अंतिम बजेट सादर करावे लागणार आहे.