शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

मराठा आरक्षणप्रश्नी निर्णायक लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 11:38 PM

सांगली : मराठा समाजातील ठराविक संपन्न मंडळी व साखर कारखानदारांवरून समाज सधन, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचा दावा कोणीही करू नये. ...

सांगली : मराठा समाजातील ठराविक संपन्न मंडळी व साखर कारखानदारांवरून समाज सधन, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचा दावा कोणीही करू नये. कारण आत्महत्या करत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये ९५ टक्के मराठा समाजातीलच शेतकरी आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी आता निर्णायक लढा उभारणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे प्रदेश प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी बैठकीनंतर बनबरे यांच्यासह पदाधिकाºयांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.बनबरे म्हणाले की, शैक्षणिक व सामाजिक पातळीवर अजूनही समाज मागास असून, त्यासाठीच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्नशील आहे. जाती-जातीमध्ये सुरू असलेला संघर्ष मिटवून सर्व जाती, धर्म एक करण्याचे मराठा सेवा संघाचे ध्येय आहे. सध्या राज्यभर राज्य मागासवर्गीय आयोगाचा दौरा सुरू असून, त्यांच्यासमोर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे. समाजाचा ओबीसीत समावेश करण्याची मागणी आहे. ओबीसीत आता समाविष्ट असलेल्या एकाही जातीवर अन्याय होऊ नये, हीच आमची आग्रही मागणी आहे. पन्नास टक्क्यांवर आरक्षण देण्यास अडचणी असल्या तरी, देशातीलच काही राज्यांनी ७५ टक्क्यांपर्यंत आरक्षणे दिली आहेत. तसेच आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्टÑातही त्याप्रमाणे आरक्षणाचा कोटा वाढविण्याचा निर्णय घेण्यात यावा. त्यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा होत राहील. आरक्षण मिळेपर्यंत लढा थांबणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी मराठा सेवा संघाचे प्रदेश सचिव मधुकर मेहकरे, दिलीप चौधरी, संभाजी ब्रिगेडचे सौरभ खेडेकर, राजेंद्रसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष आर. जे. पाटील, नितीन चव्हाण, शाहीर पाटील, अमृतराव सूर्यवंशी, डॉ. संजय पाटील, संजय देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.भाजपकडून दिरंगाईबनबरे म्हणाले की, मराठा समाजाबरोबरच इतर समाजालाही आरक्षण देण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले. मात्र, त्याची अंमलबजावणी केली नाही. भाजपला मराठा समाजाला आरक्षण देण्याची अजिबात इच्छा नाही. आरक्षणासारखे भावनिक प्रश्न संपले तर त्यांना राजकारण करणे अवघड होणार असल्याने त्यांनी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे.