शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
2
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार
3
डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
4
१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य
5
"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान
6
IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)
7
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?
8
Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?
9
शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
10
Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."
11
स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी
12
"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...
13
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
14
IPL 2025 : शाहरुखच्या KKR नं खेळला मोठा डाव; MS धोनीच्या सहकाऱ्यानं घेतली गौतम गंभीरची जागा
15
'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."
16
आता शेअर विकल्यास केवळ द्यावे लागणार ३.५ रुपये; कोट्यवधी गुंतवणूकदारांना फायदा; काय आहे नवा नियम?
17
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
18
Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम
19
India vs Bangladesh, 2nd Test : रोहितनं टॉस जिंकला, 'नो चेंज' म्हणत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय
20
आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

‘भाग्यलक्ष्मी’च्या ११ संचालकांना कैद

By admin | Published: February 03, 2016 12:37 AM

तीन वर्षांची शिक्षा : आदेशाचा भंग

सांगली : मुदत संपलेल्या ग्राहकांच्या ठेवींची रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या सांगलीतील भाग्यलक्ष्मी पतसंस्थेच्या १३ संचालकांना तीन वर्षांची कैद व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. यातील दोन संचालकांचे निधन झाले आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच न्यायालयाचे अध्यक्ष ए. व्ही. देशपांडे व सदस्या वर्षा शिंदे यांनी मंगळवारी हा निकाल दिला. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याबद्दल शिक्षा होण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच निकाल आहे. अध्यक्ष जयवंतराव धोंडिराम पाटील, उपाध्यक्ष रंगराव आबाजी पाटील, संचालक पंडितराव लक्ष्मण पाटील, राजेंद्र अर्जुने, राजेंद्र रंगराव भोसले, शिवाजीराव दत्ताजीराव पाटील, सदाशिव दुधाप्पा पाळेकर, अमरदीप जनार्दन कांबळे, तानाजी बंडू चव्हाण, पुरुषोत्तम गणपती बर्गे, विक्रम जयवंतराव पाटील (सर्व रा. सांगली) अशी शिक्षा झालेल्या संचालकांची नावे आहेत. यातील विक्रम पाटील हे अध्यक्ष जयवंतराव पाटील यांचे चिरंजीव आहेत. न्यायालयाने या सर्वांना मंगळवारी दुपारी १२ वाजता दोषी ठरवून दुपारनंतर निकाल देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दुपारी तीन वाजता न्यायालयाने तीन वर्षे कैद, प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा ठोठावली. सांगलीतील प्रशांत भगवान पाटोळे, राजाराम पांडुरंग कोळेकर, भगवान भीमराव पाटोळे या तिघांनी भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेत ठेव ठेवली होती. ठेवीची मुदत संपल्यानंतर हे तिघेही रक्कम परत घेण्यास संस्थेत गेले. त्यावेळी संस्थेने त्यांना रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांनी ग्राहक न्यायालयात संस्थेच्या अध्यक्षासह १३ संचालकांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. १५ जून २००९ रोजी याचा निकाल लागला. संस्थेने तिघांच्या ठेवींची रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. तिघांच्या ठेवींची रक्कम २५ लाखांच्या घरात होती. या आदेशानंतर संचालकांनी त्यांना केवळ प्रत्येकी पाच हजार रुपये दिले. त्यानंतर एक रुपयाही दिला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही, म्हणून या ठेवीदारांनी ग्राहक न्यायालयातच दाद मागितली होती. (प्रतिनिधी) खटल्याची सुनावणी सुरू असताना दोन संचालकांचा मृत्यू झाला आहे. सुहास पाटील व चारुशीला जाधव अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांनाही दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. ४संस्थांनी ठेवी परत न केल्याने शेकडो ठेवीदारांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. निकाल ठेवीदारांच्या बाजूने लागूनही त्यांना संस्थेचे संचालक पैसे देत नाहीत. ४या निकालामुळे संस्थाचालकांना चांगलीच चपराक बसणार आहे. ठेवीदारांतर्फे अ‍ॅड. अविनाश कुडाळकर यांनी काम पाहिले.