शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

संपर्क क्रांतीच्या सांगली, किर्लोस्करवाडीच्या थांब्यास नकारघंटाच; प्रवासी संघटना आक्रमक 

By अविनाश कोळी | Published: September 12, 2024 4:20 PM

पंतप्रधानांकडे तक्रार, काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

सांगली : चंडीगढ-यशवंतपूर व यशवंतपूर-निजामुद्दीन संपर्क क्रांतीला सांगली व किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबा देण्यास मध्य रेल्वेने पुन्हा नकार दिला आहे. त्यामुळे सांगली नागरिक जागृती मंचने मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. नागरिक जागृती मंचने याप्रश्नी सांगली व किर्लोस्करवाडीत संपर्क क्रांतीला काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला आहे.मंचचे प्रमुख सतीश साखळकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या १८ वर्षांपासून मध्य रेल्वेच्या पुणे व मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चंडीगढ-यशवंतपूर संपर्क क्रांती व यशवंतपूर-निजामुदीन संपर्क क्रांतीला सांगली व किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबा देण्यास अनेक वेळा नाकार दिला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे सांगली व किर्लोस्करवाडीला संपर्क क्रांतीचा थांबा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर रेल्वे बोर्डने सांगली व किर्लोस्करवाडीत थांबा देण्याचे आदेश दिले होते. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ते धुडकावून लावले. रेल्वे मंत्री, रेल्वे बोर्डाचा आदेशही मध्य रेल्वेचे अधिकारी मानत नाही का, असा सवाल उपस्थित केला आहे.सांगली जिल्हातील लोकांचा अठरा वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक जागृती मंचने शेवटची लढाई सुरू करण्याचा इशारा दिला आहे. मंचने याबाबत पंतप्रधानांकडे तक्रार केली असून मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून असे प्रकार वारंवार होत असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी याबाबत आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.

स्थानकावर आंदोलन करण्याचा इशारानरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केल्यानंतरही जर संपर्क क्रांतीला सांगली व किर्लोस्करवाडी स्थानकावर थांबा दिला नाही तर सांगली व किर्लोस्करवाडी स्थानकावर जोरदार आंदोलन करुन काळे झेंडे दाखवून संपर्क क्रांती रोखू, असा इशारा दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे