शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
5
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
6
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
7
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
8
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
9
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
10
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
11
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
12
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
13
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
15
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
17
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
18
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
19
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
20
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

चांदोली मत्सबीज प्रकल्प प्रशासनाकडून दुर्लक्षितच; सांगली, सातारा, कोल्हापूरला पुरेल इतके मत्स्यबीज निर्मितीची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 6:38 PM

विकास शहा शिराळा : तालुक्याचे वैभव असणाऱ्या चांदोली धरणाच्या पायथ्याला सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधलेला मत्स्यबीज प्रकल्प गेली ...

विकास शहाशिराळा : तालुक्याचे वैभव असणाऱ्या चांदोली धरणाच्या पायथ्याला सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधलेला मत्स्यबीज प्रकल्प गेली दोन-तीन वर्षे झाली वापराविना पडून आहे. यामध्ये एकाही माशाचे बीजोत्पादन झालेले नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. चांदोली धरण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या प्रमुख पर्यटन स्थळांबरोबरच चांदोलीचा मत्स्यबीज प्रकल्प पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. याकडे मत्स्य विभाग, जिल्हा प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात आहे.माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी तत्कालीन मंत्री रामराजे निंबाळकर यांच्यामार्फत हा दहा एकरमधील तीन जिल्ह्यांना फायदेशीर ठरणारा प्रकल्प मंजूर केला. जिल्हा वार्षिक नियोजन योजनेंतर्गत सुचवलेल्या या प्रकल्पाची उभारणी पूर्ण झाली आहे. यातून चांदोलीच्या पर्यटनाला गती मिळणार असून, चांदोलीच्या वैभवात आणखीनच भर पडणार आहे. शिवाय स्थानिकांना रोजगार मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

प्रकल्पाची उभारणी करताना मत्स्यबीज प्रकल्पातील तळ्याच्या बांधकामाचा भराव ठिकठिकाणी वाहून गेला होता. भरावाला भेगादेखील पडल्या होत्या. सांगलीच्या सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी प्रस्थापित केलेल्या ४ कोटी ८८ लाख ८६ हजार खर्च करून बांधला आहे.या मत्सबीज प्रकल्पात ८०० चौरस मीटरची तेरा तळी बांधली आहेत. प्रत्येक तळ्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. सूर्यकिरणांमुळे मत्सबीज नष्ट होऊ नये म्हणून कलर कोटेड शेड उभारली जाणार आहेत. उपकरणे व इतर साहित्यासाठी स्वतंत्र इमारत उभी केली जाणार आहे.या प्रकल्पांतर्गत मत्स्यबीजाची पैदास करणे, त्यांचे पालनपोषण करणे तसेच मोठ्या माशांची निर्मिती करून त्यांची देखभाल करणे, मत्स्य पिलांची साठवण करणे असे नियोजन या प्रकल्पात केले जाणार आहे. धरणाच्या पायथ्याला हा प्रकल्प उभारण्यात येत असल्यामुळे चांदोली धरणातील पाण्याचा वापर करून मत्स्य बिजापासून मोठ्या माशांचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे. नदीतील येणारे पाणी तळ्यांमध्ये साठवण्यासाठी फिल्टर चेंबर बांधण्यात येणार आहेत. तळ्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी तसेच सांडपाणी व्यवस्था मोरी बांधकाम करण्यात येणार आहे.जवळच असणाऱ्या वारणा कालव्यातील पाणी सायफन पद्धतीने तलावात सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीनंतर स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.अधिकाऱ्यांची उदासिनता तीन जिह्यांसाठी उपयोगी ठरणारा तसेच स्थानिकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प मंजूर केला. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच या विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार लेखी, तोंडी सांगितले आहे. मात्र, हा प्रकल्प सुरू करण्याबाबत उदासिनता दिसून येते.

पर्यटन, रोजगार वाढेल तसेच येथील मत्स्य व्यावसायिकांना उपयोग होईल, यासाठी हा प्रकल्प सुरू होणे आवश्यक आहे. - शिवाजीराव नाईक माजी राज्यमंत्री

टॅग्स :SangliसांगलीDamधरण