शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

कर्ज पुनर्गठनाच्या प्रश्नाची चंद्रकांतदादांकडून दखल

By admin | Published: April 21, 2016 12:02 AM

जिल्हा बँकेचे निवेदन : सांगलीत प्रश्न कळल्याचे मत

सांगली : कर्ज पुनर्गठनाच्या योजनेत शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेली जादा व्याजाची समस्या बुधवारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडली. राज्यात कुणीही ही अडचण मांडली नसल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी, यावर तातडीने निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील आणि संचालक बाळासाहेब होनमोरे यांच्यावतीने याबाबतचे निवेदन पाटील यांना देण्यात आले. होनमोर यांनी प्रत्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा केली. खरीप २०१५ मधील पन्नासपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यातील ३६३ टंचाईग्रस्त गावांमधील पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देऊन कर्जाच्या पुनर्गठनाचे आदेश राज्य शासनाने दिले असले तरी, यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुनर्गठनातील व्याजाच्या अडचणींमुळे सवलतीच्या योजनेवर पाणी पडण्याची चिन्हे आहेत. योजनेत १३ हजार ९१७ दुष्काळग्रस्त शेतकरी लाभार्थी ठरले आहेत, मात्र यातील एकाही शेतकऱ्याने पुनर्गठनासाठी अर्ज केलेला नाही. कर्ज पुनर्गठन करताना व्याजाची टक्केवारी ६ वरून १३.५ टक्क्यांवर जाते. त्यामुळे यापूर्वीही गारपीट आणि दुष्काळी सवलतीचा लाभ घेण्यासाठी आणि कर्जाच्या पुनर्गठनासाठी टंचाईग्रस्त गावांमधून प्रतिसाद मिळाला नव्हता. चंद्रकांत पाटील म्हणाले की, या प्रश्नाची आपणास कोणतीही कल्पना नव्हती. राज्यभरातून याबाबत कोणीही तक्रार केली नव्हती. सांगलीत आल्यावरच हा प्रश्न समजला. हा प्रश्न गंभीर आहे. लवकरच याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. जिल्हा बँकेमार्फत हाच प्रश्न मुख्यमंत्री तसेच महसूलमंत्र्यांकडेही निवेदनाद्वारे मांडण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)व्याज सरकारने सोसावेकर्जाच्या पुनर्गठनामुळे शासनाच्या व्याज सवलतीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळत नाही. वेळेत कर्ज परतफेड केल्यानंतर व्याजात मिळणारी सवलत चांगली असल्याने, पुनर्गठनाऐवजी टंचाईतही तजवीज करून शेतकरी कर्ज भरत असतात. त्यामुळे साडेतेरा टक्क्यांऐवजी सहा टक्के व्याजदर आकारून वरील व्याज शासनाने सोसावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.